अठरावे वर्ष - उमेदवाराची परिपक्वता महत्वाची नाही का ?
दिनांक ६ ऑगस्ट २०२३ म टा मधील " अठरावं वरीस लोकसभेचं ? वृत्त वाचले. वृत्तात फिनलँड नागरिकत्व प्रशिक्षण मॉडेलचाही उल्लेख केला आहे . भारत देशाचा विचार करता वयाची १८ वर्षे अगदीच अल्प वाटत आहेत . लोकसभेच्या एका मतदार संघात किमान ६ विधान सभा क्षेत्रांचा समावेश असून वीस लक्षांच्या वर मतदान असते . शिवाय एकूण देशाचे आकारमान , लोकसंख्या , राज्यांची संख्या , विविध भाषा , प्रत्येक राज्याचे आणि देशाचे विविध प्रश्न, या आणि आदी साऱ्यांच्या सारासार विचार करता , उमेदवाराचे वय २५ च्या पुढेच असावे हे योग्यच आहे . कारण १८ व्या वर्षी नुकतीच बारावी उत्तीर्ण होउन पदवीच्या पहिल्या दुसऱ्या वर्षात शिक्षण झालेले असते . पदवी विषयांचा सखोल अभ्यासही पूर्ण नसतो , ना वयाची , ना शिक्षणाची , ना ज्ञानाची परिपक्वता नसते . मतदार संघातील २० लक्ष्याच्या पुढील लोकसंख्येच्या प्रश्नांचा उरक एवढ्या कमी वयात झेपवू शकेल असे वाटत नाही . आता संसदीय समितीची शिफारस, निवडणूक आयोग स्विकारते का? फिनलँडच्या धोरणाशी बरोबरी करणे कितपत परिपक्वतेचे आहे ?
विजयकुमार वाणी , पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा