बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

लेख (११८) ३१ ऑगस्ट २०२३


बेगडी स्पर्धा अन् टोकाची इर्शा . . .

लोकसत्ता दिनांक ३० ऑगस्ट २०२३ संपादकीय " पालक की मारक ?" वाचले.  सर्वच पालक आपल्या मुलांमध्ये सुरवाीपासूनच इंग्रजी माध्यमात शिक्षणाची आवड जोपासत स्टेट, सीबीएससी , आयसीएसई, सीआयएससीई, आयबी यापैकी आर्थिक स्थितीचा सापेक्ष विचार न करता प्रवेश मिळवून, उच्च शिक्षण आणि अधिकारी पदाची स्वप्ने पहात असतात.  शालेय अभ्यासक्रम, खाजगी ट्युशन सांभाळत बुद्धिमत्ता , शारीरिक क्षमता वाढीसाठी अबॅकस, ऑलिम्पियाड, आयपीएम, एनटीएसई ते स्पोर्ट्स साठी ग्राउंड झीरो पर्यंतची सगळे बाह्याकर्शित क्लासेस केली जातात.  आठवीतच, बारावीच्या परीक्षेचा विचार करून, सँडविच, क्रॅश , आयसीयू कोर्सेस साठी प्रवेश घेतला जातो. या पायरी पर्यंत पालक चाळिशी पुढे आलेला असतो.  आर्थिक स्थर चांगला म्हणून, उच्चभ्रू कॉम्प्लेक्स मधील फ्लॅट, लक्सुरी हायब्रीड कार, स्टँडर्ड राहणीमानासह, या अनेक खर्चात, अपत्याचा शिक्षणाचा खर्च केला जातो.   पालकांचे मुलांच्या बाबतीत अपेक्षा वाढत जातात.  षोडशवर्षातील मुलाला बाह्य जगताचे आकर्षण वाढत जाते, पणं पालकांच्या, स्वतःच्या, इच्छा, आकांशा  पूर्ण करण्यासाठी,  स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलत असलेल्या पाल्याला गृहीत धरले जाते.  बोर्डाच्या परीक्षेत नव्वदीच्या पुढे आणि स्टेट सीइटी, जेईइ मेन, एडवांस, व्हिआयटिइइ, एनइएसटी इत्यादी मेडिकल साठी एनइइटी , एमसीइटी इत्यादी परीक्षेत शंभर पर्सेंटाइलचे ओझे घेत निर्विवाद यश मिळवावेच लागते.  इथूनच मेंटल स्टँबिलीटी वॉर सुरू होते.  काही सेंट पर्सेंटाइल कमी झाले तर, विद्यार्थ्याला कमी पणं पालकांना मोठा धक्का असतो. प्रत्येक राऊंडला पॉइंट पॉइंट सेंट वर प्रवेश स्पर्धा असते.  निकषांच्या पातळीवर प्रवेश न मिळाल्यास दोनच पर्याय असतात, स्टेट कॉलेज मधून शिक्षण घेणे अथवा रिपीटर होणे.  पणं विद्यार्थ्यांपेक्षा पालकच जास्त रिपीट साठी आग्रही असतात कारण त्यांनी मूळ पाया खणण्यापासून, पाल्यासाठी मानसिक, आर्थिक गुंतवणूक केलेली असते.  पहिल्या प्रयत्नात खचल्यावर, पाल्याची साहजिकच मानसिकता दोलायमान अवस्थेत जाण्याची अधिक शक्यता असते.  कारण एकतर उत्तीर्ण झालेल्यांचे सरकारी प्रवेश झालेले असतात आणि धनाढ्यांचे मॅनेजमेंट कोट्यातून खाजगी संस्थेत प्रवेश झालेले असतात, उर्वरित निराशेच्या गर्तेत सापडलेले राहतात.  इथेच पालकांचा दृढ निश्चय हवा, पर्सेंटाइल कमी मिळाले, त्वरित उत्तम पर्याय निवडून पुढे सरकणे महत्वाचे ठरते.  एके ठिकाणी थांबून परत तीच पायरी चढणे दुरापास्त असते .  अवास्तव ओझे आणि महत्वाकांक्षा लादून विद्यार्थाचे पर्यायाने कुटुंबाचे नुकसान करण्याच्या जीव घेण्या स्पर्धेतून माघार घेणे हि सुद्धा मानसिक अवस्थेची परिपक्वता आहे.  परंतु पालकांची, साहजिकच विद्यार्थ्याची अंतर्यामी इर्षा हि विषेसारखी फोफावून, कळीला प्रफुल्लित फुल होण्याआधीच खुरडावे लागते, हे वैषम्य पालकांना कळायला हवेच.  तडजोड स्विकारून आयुष्य समृद्ध करण्याचं कसब गवसायला हवं. एकल संततीच्या काळात अशा क्षुल्लक कारणासाठी पाल्याचा मृत्यू ओढवणे हे मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे.


विजयकुमार वाणी,  पनवेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: