मा संपादक,
लोकमानस विभाग, लोकसत्ता
महोदय,
विषय : सी डी एस कर्तव्यदक्षता आणि जबाबदारी
संपादकीय - सी डी एस कसोटी, लेखातील सर्वच मुद्द्यांचा सविस्तर परामर्श घेतला आहे. यात प्रामुख्याने चीन विषयी धोरणांची अंमबजावणी यावर भाष्य केले आहे. पाकिस्तान धार्जिणा काश्मीर प्रश्ना विषयी सी डी एस ची जबाबदारी अधिक आहे असे वाटते. कित्येक दशके पाकिस्तानची आक्रमणे आणि दहशतवाद यांचा त्रास काश्मीर पंजाब सीमावर्ती भागात गत चार पाच पिढ्यान् हूनही अधिक कायम राहिला आहे. गोळीबार, बॉम्ब ग्रेनेड हल्ले, घुसखोरी, निष्पाप नागरिकांचा जीव घेणे या साऱ्यांची लाखात घटना घडून लाखाच्या वर जीव या दशहतवादी हल्ल्यांनी घेतले असतील.
देशातील दोन्ही प्रमुख पक्षांची काँग्रेस, भाजपा आणि मध्यंतरी काळातील अल्पजीवी जनता पक्षाचे सरकार येऊन सुद्धा हल्ले कमी होत नाहीत अन जीव घेणे हल्ले काही थांबत नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार ही गत ८ वर्षे कार्यरत आहे, पणं दहशतवाद तसूभर ही कमी झालेला नाही. तिन्ही दल सैन्य प्रमुख या प्रश्नात गांभीर्याने पहात असतील, पणं त्यांना मिळालेला कार्यकाल हा नेहमी अल्पसा ही ठरत असेल. या साऱ्या विवंचनेत सी डी एस ची नेमणूक या संकटासाठी किती जमेची ठरते हे महत्वाचे ठरते. त्यांच्या युद्ध कौशल्याच्या अभ्यासाच्या पद्धती आणि त्यांना मिळणारा परराष्ट्र नीतीचा पाठिंबा यावरच या दहशत वादाचा बीमोड होणार आहे. त्यांना मिळालेला कार्यकाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे धोरण, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत शिफारशी आणि महत्वाचं म्हणजे विद्यमान सरकारचा असलेला उर्वरित कार्यकाल शिवाय जागतिक घडामोडींचे केंद्र असलेल्या अमेरिका ,रशिया यांची युद्ध निती यावर सारे अवलंबून आहे.
विजय आप्पा वाणी ,
(सध्या फ्रँकफर्ट मुक्कामी)
( महोदय आपणास विनंती की, लोकमानस सदरात सदर छापण्याची कृपा करावी).

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा