लोकसत्ता संपादकीय - संस्कृतीसातत्याचा सेतू!
अतिशय माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण लेख. या लेखात संपूर्ण जागतिक घडामोडींचा परामर्श घेतला असून इंग्लंडच्या राणीचे महत्व अधोरेखीत केले आहे. तसे पाहिल्यास एकूण सव्वा दोनशे च्या वर देश असलेल्या या जगात सौदी, कुवेत, कतार, अबुधाबी आणि इंग्लंड हि राजघराणे सर्वात श्रीमंत म्हणून गणली जातात. इंग्लंडचे राजघराणे जगातील पाचव्या स्थानावर असले तरी जगातील सर्वाधिक प्रभावशाली राजघराणे आहे. एकेकाळी हे राजघराणे जगावर राज्य करत होते. या राजघराण्याकडे अनेक अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. असेही म्हटले आहे की, जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे इंग्लंडची राणी की जीला परदेश दौरा करताना पासपोर्ट व्हिसा ची गरज पडली नाही. त्यांचा भारत दौरा हा 1961, 1983 आणि 1997 जेव्हा भारतीय स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाली होती. एलिझाबेथ यादेखील स्वातंत्र्यच्या सुवर्णमहोत्सवात सहभागी होत्या.
उपरोल्लेखात युरोपातील साम्राज्यवाद्यांचे वर्णन करताना स्पेन, पोर्तुगीज, डच यांची साम्राज्ये अत्याचारासाठी लक्षात रहातात, त्या तुलनेत ब्रिटिशांची राजवट सभ्य यासाठी की रेल्वे उभारणी, दळणवळण, नियमाधारित राज्यव्यवस्था यासाठी आठवतात. पुढे असेही म्हटले राजवट निर्दोष होती असे नाही. यातील "सभ्य राजवट" शब्द खटकतात. ब्रिटिशांच्या दिडशे दोनशे वर्षांच्या राजवटीत सभ्यता असती तर भारतवर्षातील लक्ष लक्ष जनतेचा जुलमी राजवटीत जो अनन्वित छळ झाला , जुलूम झाले ते झाले नसते. असो, पण एकंदरीत एकोणाविसाव्या शतकापासून एकविसाव्या शतका पर्यंत सार्वभौमत्व राणी पद मिरविणे खरोखर भाग्याचे आणि ऐतिहासिक आहे, जे पुढील भविष्यात होणे नाही.
विजय आप्पा वाणी , पनवेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा