शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर लोकसत्ताा अन्यथा "माझा कुणा म्हणू मी"
ब्रिटनच्या ऋषी सूनक ते यू एस च्या कमला हॅरिस यांच्यासह भारतीय वंशावळीचे "अन्यथा" नेहमी सारखेच माहितीपूर्ण अर्थात खुमासदार आहे.
भारतातल्या भारतात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नोकरी व्यवसायानिमित्त स्थलांतरीत होणाऱ्या व्यक्तीकडून नोकरी व्यवसाय मिळण्यासाठी अपेक्षा केली जाते, म्हणजे दूर असला तरी आपल्या कामाचा अशी मानसिकता बनली आहे. त्याचप्रमाणे भारतातून अनेकांनी पोटा पाण्यासाठी, नोकरीसाठी युरोप, यू एस मध्ये स्थलांतर केले. त्यांच्या आज दुसऱ्या, तिसऱ्या पिढ्या या देशांत वाढत आहेत. त्याकाळात या सर्वांनी अनेक संकटाना तोंड दिले. वातावरण बदल, खाण्याच्या सवयी, भाषा, शिक्षण, वर्णभेद, यातून मार्गक्रमण करीत स्वतःला सिद्ध करून पुढची पिढी घडविली. दुसऱ्या पिढीही यातून कमी अधिक प्रमाणात त्रास सहन करून स्थिरावल्या आहेत. हे सारे त्रास सहन करीत असताना याच देशांच्या सवयी अंगवळणी पडल्यामुळे साहजिकच त्या देशाचे प्रेमही वाढीस लागले. खरंच हे सारे देश स्वच्छ्ता, शिस्त, शिक्षण, आर्थिक नियोजन, वर्तणूक वैगेरे बाबीत आपल्या देशाच्या पुढे आहेत , हे "अन्यथा" सदरात वेळोवेळी अधोरेखित केलेच आहे. ज्या देशात जन्माला आले, किंवा शिक्षण झाले आणि स्थायिक झालेत , साहजिकच अंगवळणी पडलेले गुणच स्वभावात येतात आणि तशी वर्तणूक होते.
परदेशस्थ नागरिकांना आपल्या देशाचे बाह्यरूप अथवा महत्वाच्या घडामोडी कळतात, परंतु अनिवासी भारतीयांना अथवा भारतीय वंशाच्या लोकांना अंतर्गत घडामोडी सोबत देशातील संस्कृती म्हणा किंवा असमंजस वर्तणूक करणारे साऱ्याच आघाडीतील गुणवंत पणं दिसतात. हळू हळू त्यांच्या विचारात व्यक्तींविषयी, नातेवाईकांविषयी , समाजाविषयी, राजकारणाविषयी, देशाविषयी एक अढी निर्माण होते आणि ओढ कमी झाल्यामुळे, त्याचे प्रतिबिंब उच्च पदावर पोहोचल्यावर त्यांच्या धोरणात दिसून येते. परंतु आपल्या सवयीनुसार आपल्याला सारेच आपले वाटतात आणि साहजिकच आशा अपेक्षा वाढीला लागतात. सदरचा लेख खरोखर माझा माझा म्हणणाऱ्यांना चपराक आहे . म्हणून माझा कुणास न म्हणता , आमचे आम्हीच तालेवार असे व्हावे लागेल.
विजय आप्पा वाणी ,
(सध्या फ्रँकफर्ट मुक्कामी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा