लोकसत्ता संपादकीय - आजा मेला नि - पक्ष्याध्यक्ष - या लेखात विस्तृतपणे काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. राजकीय पक्षाचे अध्यक्षपदाचे महत्व अधोरेखित केले आहे. देशात एकंदरीत सर्वच राजकीय पक्षांच्या कार्याविषयी आढावा घेतला असता, असे निदर्शनास येते की, स्वातंत्र्या नंतरच्या काळात काँगेस एकमेव पक्ष होता की ज्यांची साऱ्याच राज्यांवर सत्ता होती. केरळ, बंगाल मध्ये कम्युनिस्टांची, तामिळनाडू मध्ये द्रमुक,अण्णा द्रमुक पक्षाची. या कालखंडात विरोधी पक्ष म्हणून जनसंघ प्रभावशाली नव्हता. पण या साऱ्याच पक्षांचे अध्यक्ष अत्यंत प्रभावशाली आणि कर्तबगार होते. सत्ता मिळत नसली तरी पक्ष संघटना मजबूत असावी यावर त्यांचा भर असे. गेल्या तीन चार दशकात साऱ्याच राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य निर्माण झाले. तामिळनाडू होतेच, त्यात आंध्र, तेलंगणा, प.बंगाल, हरियाणा, पंजाब, दिल्ली, काही प्रमाणात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. महाराष्ट्रातील शिवसेना या प्रादेशिक पक्षाने सुरवातीस पालिकांमध्ये जम बसविला आणि युती, आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या , केंद्राच्या सत्तेत भागीदारी मिळविली यात पक्ष नेतृत्वाचा अर्थात पक्ष अध्यक्षांचा दूर दृष्टिकोन असेल. याच काळात भाजपने ज्यांची पक्ष संघटनेवर मजबूत पकड असलेले पक्षाध्यक्ष निर्माण केलेत आणि त्यांच्या कारकीर्दीत पक्ष साऱ्याच उत्तरी राज्यात, कर्नाटका पर्यंत बहरत गेला. देशात, राज्यात सत्ता पटलावर भाजपने सार्वभौमत्व मिळविले ते केवळ पक्ष संघटनेवर मजबूत पकड असल्यामुळेच. या उलट परिस्थिती काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट, समाजवादी, अकाली दल, तेलगू देसम आणि अन्य काही प्रमाणात प्रादेशिक पक्ष यांची पक्ष स्थिती खिळखिळी झाली याचे प्रमुख कारण म्हणजे पक्ष संघटने कडे दुर्लक्ष, घराणेशाहीला प्रोत्साहन, सत्तेसाठी पक्षांशी युती करणे, काडीमोड घेणे , नको त्या विषयावर टिका टिप्पणी करणे आणि कुरघोडी करणे, या महत्वाच्या आणि अनेक कारणांनी यांचे पक्ष कमकुवत होऊन, सत्तेच्या सारीपाटापासून दूर सारले गेलेत. याचे ताजे उदाहरण महाराष्ट्रात घडले आहे. या पक्षाने तरी आता संपादकीयात म्हंटल्याप्रमाणे काँग्रेस पक्षा सारखी वाताहत करून घ्यायची नसेल तर शहाणे व्हावे, शिकावे आणि योग्य धडा घ्यावा.
विजय आप्पा वाणी ,
(सध्या फ्रँकफर्ट मुक्कामी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा