शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

लेख २ (दिनांक १८ ऑगस्ट २०२२)



अबलीकरण का गुन्हेगारीचे उदात्तीकरण. . . . . .

सामूहिक गुन्हा होतो त्याकाळात फार मोठ्या प्रमाणावर चर्चा,संवाद, विरोध, मागणी, धोरणे, कायदा, सरंक्षण व्यवस्था, धर्म,जात, स्त्री, पुरुष सर्व मुद्दे घासून घासून चर्चिले जातात. खर म्हणजे अन्याय कोणावर, कुठल्या ठिकाणी होती, त्या शहराची, राज्याची वर्तमान पार्श्वभूमी काय, सत्ता कुणाची, अन्याय व्यक्तीची जातपात, गुन्हेगाराची जातपात यावर बरेच अवलंबून असते. 


गुन्हा घडण्याच्या वेळेस आणि नंतर चौकशीसाठी पोलीस यंत्रणेचा वापर कशा प्रकारे केला जातो किंवा होतो, या साऱ्यांच्या चीरफडीतून न्याय व्यवस्थेकडे गुन्हा वर्ग केला जातो. यातही पुढे हे प्रकरण हाताळण्यासाठी वकील वर्ग, अर्थात निष्पक्ष न्यायसंस्थेतील न्यायाधीश यांच्या कडून कशा प्रकारे, कोणत्या प्रकारे सदर प्रकरण हाताळले जावे, याची सुद्धा बारकाईने विचार करूनच मार्ग अवलंबला जातो.  


गुन्हा घडण्यासमयी माध्यमातून आलेले वृत्त, न्यायसंस्थेत असताना आलेले वृत्त आणि निकालाच्या वेळेस आलेले वृत्त, यात कुठेही ताळमेळ नसतो. कारण या तीनही वेळेस (गुन्हा वेळ, न्यायालय आणि निकाल) सत्ता कुणाची यावरच वृत्तांकनाची धार बऱ्याच प्रमाणावर अवलंबून असते. या मुळेच गुन्हा करणाऱ्यांचे फावते कारण गुन्हा करण्यास प्रवूत्त करण्यापासून ते निकाल लागेपर्यंत कुणी ना कुणी तरी यांची पाठराखण करणारा असतोच. सारांश हाच असू शकतो, गुन्हा मॅनेज, पोलीस यंत्रणा मॅनेज, वकील मॅनेज, साक्षीदार मॅनेज, न्याय व्यवस्था मॅनेज, या सर्वावर कडी म्हणजे शासन व्यवस्था मॅनेज करणारे आणि करून घेणारेही मॅनेज. कुणी कुणास जबाबदार नाही कारण सर्वच मॅनेज.


विजयकुमार आप्पा वाणी , पनवेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: