मा संपादक लोकसत्ता, लोकमानस विभाग,
बिहार मागास राहिले, कारण. .
प्रशांत रूपवते यांचा "लास्ट अमंग इक्वलस: पॉवर कास्ट अँड पॉलिटिक्स इन बिहार व्हीलेजेस, लेखक एम आर शरण यांच्या पुस्तकावरील परीक्षण वाचले. वाचताना, जाती धर्माचे राजकारण प्रगतीला कसे आड येते याचे विदारक चित्र लेखकाने उभे केले आहे.
संपूर्ण भारतात अनेक राज्यात, प्रांतात थोड्या फार प्रमाणात का होईना जाती धर्माच्या राजकारणाची झळ स्वातंत्र्यानंतर ही अनेक दशके जनतेने भोगली आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार अडीच ते तीन लाखांच्या वर लोकसंख्या असलेली अंदाजे ३०० शहरे आहेत जिथे महापालिका अस्तित्वात आहेत. नगरे आणि मोठ्या खेड्यांमध्ये २००० च्या आसपास नगरपालिका आहेत. उर्वरित गाव पातळीवर ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आहेत. विश्लेषण देण्याचे कारण हेच की या मोठाल्या महापालिकेतही चकचकीत कार्यालयांचा , मॉल थिएटर, रेल्वे स्टेशन प्रभाग सोडता कित्येक प्रभागांमध्ये जाती धर्माच्या राजकारणाची झळ अजूनही अस्तित्वात असून अनेक शासकीय योजना कागदावरच पडून असतात. अस्वच्छता, दुर्गंधी, बकाल लोकवस्ती, अनधिकृत बांधकामे, अनियमित पाणी, वीज पुरवठा, हे तर वर्षानुवर्षे पाचीला पुजले आहे. विकासाची कामे करणे शासनाचे कर्तव्य आहेच, परंतु अद्यापही महापालिका विभागात तत्सम वस्तीत शाळा, विद्यालये यांचा अभाव जाणवतो त्यामुळे साक्षरतेचे प्रमाण वर्षानुवर्षे जैसे थेच राहते.
लेखकाने जरी गाय पट्ट्यातील स्थितीचे विदारक चित्र उभे केले आहे, ते इतर सर्वच राज्यात, प्रांतात वेगवेगळ्या माध्यमातून परावर्तित होत आहे. याचा अर्थ प्रगतिशील राज्ये, शहरे थोड्याफार फरकाने सारे अनुभवीत आहेत, पणं लेखकाने बिहार राज्यातील स्थिती दाखवून सत्य साऱ्या समोर मांडले आहे.
विजयकुमार आप्पा वाणी , पनवेल.
( महोदय आपणास विनंती की, लोकमानस सदरात सदर छापण्याची कृपा करावी).

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा