शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

दिनांक १ऑगस्ट २०२२


"राजभवनातील राधाक्का" अतिशय समर्पक असे नाव या लोकसत्ता  संपादकीय लेखास आहे. अनेक योग्य संदर्भ या लेखात मांडलेले आहेत.  

यातील मूळ मुद्दा मुंबईच्या जडण घडणीत वाटा मराठ्यांचा का परप्रांतीयांचा, जो एक कित्येक वर्षे पेटविला जात आहे. मुंबई, ज्यात पिढ्यानपिढ्या मराठी जनांचीच वस्ती होती त्यात पारतंत्र्यात असल्या करणे, साहजिकच कमी वस्ती आणि स्वतंत्र बेट म्हणून पोर्तुगीज, इंग्रजांनी व्यापार उदिमाची सुरुवात केली.

त्यासाठी लागणारे मनुष्य बळ मुंबईच्या आसपास प्रांतातून आलेच पणं पारतंत्र्यात असलेल्या देशाच्या सर्वच भागातून रोजगार शोधण्याच्या निमित्ताने स्थायिक झाले. म्हणजेच आपले स्वतःचे स्थान सोडून उदरनिर्वाहासाठी आलेले फक्त ते फक्त स्थायिक झाले पणं ते स्थानिक म्हणून कधीच नव्हतेच. 

जसं जशी यांची संख्या वाढू लागली तसतशी जातीयवाद, प्रांतवाद, धर्माची ठिणगी या शहराच्या स्वामित्वासाठी पडू लागली. तत्कालीन तथाकथित नेते ज्यांचे राष्ट्रीय स्थरावर राजकारण संबंध होते, त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत हा मुद्दा केवळ मतांसाठी , परप्रांतियांना खुश ठेवण्यासाठी तेवत ठेवला. स्थानिक राजकारण्यांनी सुद्धा निवडणुकीपुरता या मुद्याचा वापर वर्षानुवर्षे केला.  

पण मराठ्यांचे सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने, अग्रगण्य मराठी वृत्तपत्रांनी, तत्कालीन सारस्वतानी, साहित्यिकांनी, खेळाडूंनी, मोठमोठ्या हुद्द्यावरील प्रतिष्ठितांनी, उद्योग व्यवसायातील व्यापारी, कारखानदारांनी आणि तथाकथित पुढाऱ्यांनी , कधीही एकत्र येऊन यासाठी पुढाकार घेतला नाही का हिम्मत दाखविली नाही.  

एकदा का मुंबई फक्त आणि फक्त मराठ्यांचीच अशी चळवळ या साऱ्या नेतृत्वाने सर्व पक्ष भेद, जाती भेद सारून सुरू केली तर एक वर्ष, दोन वर्षे जातील पणं सर्व दूर धाक निर्माण होऊन, भविष्यात तरी मुंबई कुणाची असे म्हणण्याची हिम्मत होणार नाही, नव्हे तर मुंबईत सर्वच प्रशासकीय पदांवर नेमणूक सुद्धा मागणार नाहीत आणि मिळाली तरी लज्जेने, शरमेने, घाबरून तरी राहतील असा दबदबा निर्माण होणे आवश्यक आहे. नाहीतर दर वर्षी एखाद दुसरा सोंगाड्या मुंबई अमक्याची असे म्हणणे चालूच ठेवेल आणि असे परखड अग्रलेख लिहिणारे संपादक राहतील याची शास्वती नसल्यामुळे या पुढील डिजिटल युगातील साऱ्या पिढ्या, विरार, कसारा, कर्जत, पनवेल येथे राहून इंटरनेटवर मराठी टक्का शोधीत राहतील.  

विजयकुमार आप्पा वाणी , पनवेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: