बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

लेख (१४२) २ नोव्हेंबर २०२३

 


व्यवसाय , रोजगारनिर्मिती साठी ताबडतोब प्रयत्न व्हावे !!

 म टा  दिनांक १ नोव्हेंबर २०२३, अंकातील "धोक्याच्या वळणावर" संपादकीय वाचले .  मराठा समाज गत ३० वर्षे सगळ्याच सरकार विरुद्ध आरक्षणाचा लढा देत आहे. पण दुर्देवाने सगळ्या सरकारांनी, अनेक क्लृप्त्या लढविल्या पणं मार्ग काही मिळत नाही.  राज्यकर्त्यां पुढे पेच निर्माण झाला आहे ,  विरोधकही सत्ताधाऱ्यांना नामोहरम करण्याची अनायसे मिळालेली संधी सोडत नाहीत . लेखात केंद्र राज्य सरकार , आंदोलकांचे नेते , सर्व पक्षीय नेते यांनी त्वरित तोडगा काढावा,असे म्हटले आहे, जे पहिल्याच प्रयत्नात होणे अपेक्षित होते.   दुसऱ्या प्रयत्नात, केंद्र राज्य शासनाने, मराठा समाजातील तरुणांच्या वय, शिक्षण याचा विचार करून ,व्यवसाय ,रोजगार निर्मितीसाठी, त्वरित पॅकेज घोषित करावे. प्रत्येक गाव पातळीवर , तालुका पातळीवर , समन्वयक नेमून शासनाचीच जागा , उत्पादन, विक्री याचे साखळी व्यवस्थापन करून, प्रत्येक तरुणाला सामावून घेऊन, शिक्षणा प्रमाणे , वयाप्रमाणे रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावे . व्यवसाय, रोजगार संधी उपलब्ध करून दिल्यास मराठा समाजास थोडा तरी दिलासा मिळेल.  आर्थिक उत्पन्नावर कुटुंब व्यवस्था चालते, पण कुटुंब होण्यासाठी , लग्न होणेही महत्वाचे असते, जे बेरोजगारीमुळे, अत्यल्प , तुटपुंज्या कमाई मुळे होतच नाही . या आधाराने उत्पनाचे साधन निर्माण होऊन, जीवन जगण्याच्या आशा पल्लवीत  होतील.  आरक्षण मिळणारच , त्यामार्फत नोकऱ्याही मिळतील ,  इतक्या वर्षांचा अनुशेष भरून निघणार नाही,  परंतु नवीन मार्गक्रमण सुरु होईल .  

विजयकुमार वाणी , पनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: