मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०२३

लेख (१४५) १५ नोव्हेंबर २०२३



शेतकऱ्यांसारखे हाल अपेष्टाचे पुढवे रूप शिक्षित तरुण !!


लोकमत दिनांक १४ नोव्हेंबर २०२३  "आकांक्षाचीच चाळण" अतिशय परखड लिहिलेले  संपादकीय वाचले.  मुळात मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याचे संगोपन , शिक्षण , कमविण्यासाठी व्यवसाय किंवा नोकरी आणि पुढे विवाह अशा सोपस्कारातून ऋतुचक्र सुरू असते. अगदी साठ सत्तर वर्षांपूर्वी ठीक चालले होते.  कुटुंबात चार मुले जरी जन्माला आली तरी एकत्र कुटुंब व्यवसायात शेती, दूध विक्री, किराणा दुकान वैगेरे व्यवसायात सामावून घेतले जात असे. पुढे विभक्तीकरण झाल्याने आणि कुटुंबीय संख्या वाढल्याने, शेतीची वाटणीत अल्पशी जमीन, घरगुती व्यवसायांवर उतरती कळा लागली.  शिक्षण आवश्यक आणि उदर निर्वाहासाठी रोजगार , नोकरी आवश्यक वाटू लागले.  परिणामी शिक्षित तरुणांची संख्या आणि उपलब्ध होणारा रोजगार याचा ताळमेळ बिघडत गेला.  शासकीय, अशासकीय, खाजगी जागा कधी काळी उपलब्ध झाल्यास, गाव पुढाऱ्यांच्या , नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या दलदलीत योग्य, पात्रता असलेल्या उमेदवारांना डावलले जावून वशिलेबाजीच्या तट्टुंची वर्णी लागत गेली.  सामान्य तरुण मात्र पदवी शिक्षण, स्पर्धा परीक्षा क्लासेस , जाहिराती, अर्ज , मोर्चा आंदोलने, पुढाऱ्यांची आश्वासने  या दृष्ट चकात गुरफटून गेला आहे. यातून हे युवक बाहेर पडण्याची सुतराम शक्यता नाही, हे राज्यकर्त्यांना देखील ठावूक आहे.  परंतु थाथुर मातुर अमिषे दाखवित शेतकरी जसे हाल अपेष्टा सहन करीत जीवन कंठीत आहेत, त्याची पुढची पायरी शिक्षित युवकांची होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ते बदलण्याची चिन्हे येत्या दशकभर तरी दिसत नाही.


विजयकुमार वाणी,  पनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: