गुरुवार, १९ जानेवारी, २०२३

लेख (४७) २० जानेवारी २०२३


 

पडलो तरी नाक वर . . . .


आजच्या मटा तील संपादकीय "फसलेल्या देशाची कहाणी "  लेख वाचला.  १९४७ इंग्रजांनी भारताचे विभाजन करून मुस्लिम राष्ट्रवाद निर्माण केला. त्याच वर्षी २२ऑक्टोबर १९४७ रोजी पाकिस्तानच्या पश्तून आदिवासी सैन्याने राज्य सरहद्दी ओलांडून काश्मीर मिळवण्यासाठी सुरू केलेले युद्ध आजतागायत सुरू आहे.  गेले दोन दशकांहून अधिक,  पाकिस्तान आर्थिक संकटातून मार्गक्रमण करीत असताना देखील, गेल्या वर्षी संरक्षण क्षेत्रासाठी १५०० अब्ज रुपयांची तजवीज केली होती, जी वर्षानुवर्षे वाढतच आहे.  परकीय गुंतवणूक नाही, १५० अब्ज डॉलर विदेशी कर्जे, वाढता महागाई दर, देशात सर्वच सुविधांची आबाळ, अन्नाची मोदात असताना,  संरक्षणावर एवढा खर्च होत आहे यावर २५ कोटी जनता काही बोलत नाही ना उठाव करीत नाही यावर त्यांचा भारतविरोधी आकस रोजचे दहशतवादी हल्ले, ड्रोनच्या सहाय्याने शस्त्र पुरवठा, अशा कुरापतींमधून वाढतच आहे. यासाठी यांना आर्थिक रसद कुठून येते सर्वज्ञात आहे. भारताची गेल्या ७५ वर्षांतील प्रगती, प्रगल्भ लोकशाही, सार्वभौमत्व, या साऱ्या गोष्टींचा, आखाती देश, मुस्लिम धार्जिणे युरोपीय राज्ये, अमेरिका आणि महत्वाचे चीन यांच्याही डोळ्यात खुपतो आहे. त्यामुळे या अवघड अवस्थेतही पंतप्रधान शाहबाझ शरीफ गेल्या तीन युध्दांची खेदाने मीमांसा करताना जम्मू काश्मीर चा मुद्दा विसरले नाहीत. यावरूच त्यांचा पडलो तरी नाक वर हा तोरा दिसून येतोच.

विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: