रविवार, १५ जानेवारी, २०२३

लेख (४४) १६ जानेवारी २३

 



सहली आणि सुरक्षितता

लोकमत दि १० जानेवारी २३ अंकातील सहलीला आलेल्या दोघांचा मृत्यू या वृत्ताची दखल घ्यावीशी वाटते. पूर्वीपासूनच हिवाळ्यात शालेय विद्यार्थ्यांच्या वयोमानाप्रमाणे त्याच शहरात, जिल्ह्यात किंवा दूरवरच्या प्रसिद्ध ठिकाणी सहलींचे आयोजन केले जाते. एक दिवसीय सहल असेल तर भल्या पहाटे निघून रात्री परतणाऱ्या असतात. दूर जाणाऱ्या सहलींचे आयोजकांकडून राहण्याची व्यवस्था खर्च याचा बारकाईने विचार करून रात्री प्रवास करून दिवसभर भटकंती आणि पुन्हा रात्रीचा प्रवास असतो. विद्यार्थ्यांच्या शाळेतील सवयींचा अभ्यास करता, तीन चार तासिके नंतर मिळणारी लघवीला जाण्यासाठी, अल्पोपहरासाठी मधली सुट्टी आणि पुढच्या तीन चार तासिके नंतर दिवसाची सुट्टी हे बालपणापासून सवयी जडलेल्या असतात. भल्या पहाटे निघाल्याने जागरण, खाण्याच्या वेळेत, हवामानात बदल, शरीरास अपायकारक ठरतात. शहरी भागातील विद्यार्थ्यांना गड किल्ले चढाई, विहिरी, तलावात पोहण्याचा, तीव्र थंडी, याची विशेष सवय नसते. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील वाहतूक, समुद्रात पोहण्याचा सराव नसतो. पण केवळ उत्सुकतेपोटी आणि शिक्षकांच्या दृष्यीआड पटकन निर्णय घेऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून दुःखाचे सावट उभे करतात. या बाबींची कितीही ठळक पणे नोंद घेऊन , काळजी घेऊन सहलींचे आयोजन केलेले असले तरी वर्षात एक दोन अपघात होतच असतात. एकच अपत्य असणाऱ्या या काळात , आपल्या अपत्याचे असे निष्काळजी पणे अपघाती जाणे हे पालकांसाठी खूप धक्कादायक आहे. आयोजक, शिक्षक यांचा दोष असो / नसो पण वाईट घटनेचे सारे खापर त्यांच्यावर फोडले जाते. गड किल्ल्यावरील चढाई, तलावातील, समुद्रातील पोहणे , यासाठी सूचना, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. सध्यकालात पालकांचे फिरण्याचे प्रमाण पाहता, या सहलींसाठी फक्त गरजू मुलांनाच सहलीस नेल्यास विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित राहून काळजी घेतली जाईल. याचा विचार सर्वच शाळांनी सहलींचे आयोजन करताना नक्कीच करावा. 


विजयकुमार आप्पा वाणी , पनवेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: