शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३

लेख. (४१) ६ जानेवरी २०२३



मुंबई चौफेर, दि ६ जानेवारी २३ च्या , संपादकीयात "आत्मनिर्भरतेचा संकल्प दृढ करा" लेखात आपल्या देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख अनेक उदाहरणे देऊन रेखाटण्यात आला आहे. केंद्र सरकारने दुसऱ्या टर्म नंतरच्या अर्थ संकल्पात अनेक बदल घडवून आणले आहेत. अर्थसंकल्पातील प्रमुख उद्दिष्टांपैकी, डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून वितरण, राष्ट्रीय पायाभूत प्रकल्प, आपत्ती निवारण, निवृत्ती वेतन आणि विम्याच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा. माजी पंतप्रधानांप्रमाणेच “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” लोकप्रिय घोषणा, भ्रष्टाचार मुक्त- धोरण आधारित सुशासन, पारदर्शी आर्थिक क्षेत्र, कृषी, सिंचन आणि ग्रामीण विकास, निरोगीपणा,पाणी, स्वच्छता, शिक्षण आणि कौशल्य, या नानाविविध प्रकल्पांमधून आत्मनिर्भरतेची गुंतवणूक वाढत आहे. रस्त्यांचे जाळे विणल्यामुळे निर्यात वाढ होत आहे . आत्ताच झालेले मायक्रोसॉफ्ट इस्त्रो करार, राफेल निर्मिती, हायड्रोजन निर्मिती प्रोत्साहन हि प्रगती साधून राज्यांमध्ये गुंतवणूकीद्वारे समतोल साधला जात आहे. बँक पोस्ट यांनी व्याज दर वाढविल्याने आर्थिक क्षेत्रातील मंदीचे सावट दूर होण्यास सहाय्य होत आहे. कठोर अंमलबजावणी, आर्थिक शिस्त आणि कार्य करण्यास वाव दिल्यास याचे परिणाम नक्कीच चांगले राहतील. 

विजय आप्पा वाणी , पनवेल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: