बुधवार, ७ डिसेंबर, २०२२

लेख २७

 ७ डिसेंबर रोजीचा " नुरा कुस्ती!" अत्यंत चपखल अशा दोन शब्दात संपूर्ण परिस्थितीचे वर्णन केले आहेच पण परिपूर्ण माहिती लेखात विस्तृत केली आहे. ज्यांना खरोखर सीमा प्रश्न माहिती नाही, त्यांच्यासाठी आजचे संपादकिय अतिशय उपयुक्त आहे. 

महाजन आयोगाच्या शिफारसी पासून ते आजतागायात ६५ वर्षात काँग्रेसने ५३ वर्षे, शिवसेनेचे ७ वर्षे आणि भाजपाने ५ वर्षात एकूण २० मुख्यमंत्र्यांनी राज्य केले. लेखात दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तंभात म्हटल्याप्रमाणे या साऱ्यांनाच विशेषतः माजी मुख्यमंत्र्यांना जर हे स्टेटस् माहिती नसेल तर ह्याहून दुर्दैव नाही. असे असून या घडीला देखील सारे माजी मुख्यमंत्री, पक्षीय नेते, कोणत्या आधारावर गर्जना करून सीमावासीयांना आणि राज्यातील जनतेला संभ्रमात टाकीत आहेत. त्यावर मिडिया वृत्तपत्रे ठळक प्रसिद्धी देऊन विषयाला फोडणी देत आहेत. लेखात म्हटल्याप्रमाणे वास्तविकता असेल तर हि माहिती दोन्ही राज्यातील सीमावासी यांच्या पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. लेखात म्हटल्याप्रमाणे तिसऱ्या पिढ्या यातून जात आहेत आणि प्रश्नास हवे तेवढे वलय आता राहिलेले नाही.  

सद्य मुख्यमंत्री आणि मंत्री मंडळाने खरी स्थिती दोन्ही राज्यातील जनतेस अवगत करावी आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत पुढाकार घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत म्हणजे निदान काही वर्षे तरी या प्रश्नापासून कमीत कमी महाराष्ट्र राज्यात शांतता राहील. 


विजय आप्पा वाणी, पनवेल 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: