"होऊ शकते फक्त इच्छा शक्ती हवी".
लोकमत दिनांक १० डिसेंबरच्या अंकातील ट्रॅफिकची तुंबई विषयी लेख वाचला. मुंबईतील ट्रॅफिक हे पाचीलाच पुजलेले आहे. नित्य नियमाने वाशी, मुलुंड आणि दहिसर चेक नाका येथे रोज सकाळी ८ ते १० दरम्यान वीस हजार कार्स प्रत्येक तासाला तिन्ही नाक्यावरून मुंबईत शिरत असतात. त्यात मुंबई शहरातील ट्रॅफिक, बांद्रा सी लिंक, ईस्टर्न फ्री वे वर अंदाजे सेकंदाला चार गाड्यांचा प्रवेश या वेगाने प्रवेश करतात. म्हणजे १४४०० तासाला या वेगाने सकाळच्या तीन तासात तब्बल ४३००० कार्स एकट्या ईस्टर्न फ्री वें वरून मुंबईत शिरतात. मध्य मुंबई, पश्चिम मुंबई या पट्ट्यातील येणारी ट्रॅफिक याच वेगाने येत असते. म्हणजे तासाला ५० हजार गाड्या मेट्रोो सिनेमा जंक्शन, वाडी बंदरातून आत शिरतात. लोकल ट्रेनने जरी मुंबईत उतरलो तरी पुढील प्रवास बेस्ट, टॅक्सी ने करावाच लागतो, त्यात २ किमी अंतरासाठी कमीतकमी पंधरा मिनिटे लागतातच. त्यात भर पडणारी दिवसभरातील वर्दळ वेगळी. हेच गणित संध्याकाळी बाहेर पडताना असते.
अनेक वर्षे अनेक वाहतूक तज्ञांनी पोलीस अधिकाऱ्यांनी यावर अभ्यास केला, परदेश दौरे केलेत पणं नियोजनात म्हणावी तशी सुधारणा होत नाही. एकट्या नरिमन पॉइंट मध्ये कमीतकमी १५ मजले उंचीच्या २०० इमारती आहेत. अंदाजे ३००० कार्यालयातून प्रत्येकी १०० म्हटले तरी ३ लक्ष कर्मचारी अधिक त्यांची वाहने दोन किमी परिसरात पार्किंग सह असतात. महापालिका, मंत्रालय, एल आय सी , पोर्ट, ऑईल कंपन्या, बँका, अशा दांडग्या जनसंपर्क असलेल्या कार्यालयामुळे अधिक भर पडते. सिबिडी, बीकेसी अशी केंद्रे विकसित केलीत पणं आणखीनच गलथान व्यवस्था नियोजन दिसू लागले. यावर उपाय योजने साठी प्रत्येक बिल्डिंगच्या कार्यालयांचा, रस्त्याचा, वेळेच्या गणिताचा अभ्यास नियोजन करावे लागेल. शासकीय, खाजगी , हॉस्पिटल्स अशी वर्गवारी करून शिफ्ट प्रमाणे कामांच्या सक्तीच्या, बंधनकारक, वेळा प्रमाणित कराव्या लागतील. जेणेकरून २५ टक्के भार हलका होण्यास मदत होईल आणि आज ज्या प्रदूषणाच्या विळख्यात मुंबई शहर आहे त्यातूनही मोकळा श्वास घेऊ शकते, होऊ शकते फक्त इच्छा शक्ती हवी.
विजय आप्पा वाणी, पनवेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा