रविवार, ४ डिसेंबर, २०२२

लेख २६ ( ४ डिसेंबर २२)

 दिनांक ४ डिसेंबर च्या लोकसत्तेत पश्चिम रेल्वे प्रवासी संख्येत घट या वृत्तासंबधी - 


चर्चगेट ते विरार-डहाणू (अंधेरी सीएसटी/पनवेल) अशा द्रविडी प्राणायामाचा एकूण १२० किमी, पनवेल ४० किमी या रेल्वे मार्गावर दररोज ३५ लक्ष प्रवासी प्रवास करतात असा २०१९-२० चा आकडा दर्शवितो. कोविड पासून ते आजपर्यंत हि प्रवासी संख्या ९ लाखाने कमी का झाली याचा अभ्यास प. रे. करणार आहे.  


या संख्यांचा अभ्यास करता असे निदर्शनास येते की, ३ मिनिटाला एक लोकल या प्रमाणे २२ तासात ४४० फेऱ्या, प्रत्येक लोकल १५ डब्यांची धरल्यास एका डब्यातील ७५ प्रवाशांसह एकूण ११२५ प्रवासी संख्या एका लोकलचे, गुणिले ४४० फेऱ्या एकूण अंदाजे ५ लक्ष ( पीक/साधे हावर्स धरून) याचे प.रे. ने दिलेल्या रोजच्या ३५ लक्ष प्रवाशांचे गुणोत्तर काढल्यास ७ पटीने अधिक येते. म्हणजे १० रुपये रोजचे प्रत्येक प्रवाशाचे धरल्यास ५० लक्ष होतात त्या ऐवजी अधिक ३५० लक्ष जमा होतात. एवढी भरभरून वाहून जाणारी प्रवासी संख्या त्याचे मिळणारे उत्पन्न आणि त्या बदलात दिली जाणारी सेवा याच्या संदर्भात प.रे. ने अभ्यास केल्याचे कधी ऐकिवात नाही. परंतु प्रवासी संख्या कमी झाली असे निदर्शनास आल्या आल्या अभ्यास गटाची निर्मिती.  


पश्चिम रेल्वे क्षेत्रातील आमचे सारे लोकप्रतिनिधी यांच्या कक्षेतील हा प्रश्न , पणं केंद्र सरकारच्या अखत्यारीतील म्हणून, यांचे - त्यांचे सरकार, एवढा महसूल मिळवून देतो, कर भरतो यावर घोषणाबाजी करीत बसतो. तिन्ही मार्गांवरील (परे मरे हा) या प्रश्नांवर अभ्यास करून, प्रवाशांचे सारे प्रश्न हातात घेऊन सत्ता असो वा नसो प्रश्नांची तड लावली तरच लोकाभिमुख कार्य करण्याचे श्रेय मिळेल आणि आम्ही पोकळ घोषणा निरर्थक वक्तव्ये हिच परंपरा कायम ठेवतो. म्हणूनच प रे अधिकारी कमी झालेल्या प्रवाशांबद्दल अभ्यास करू शकतात. श्री आश्र्विनी वैष्णव , कर्तव्यदक्ष मंत्री आणि राज्य मंत्री श्री रावसाहेब दानवे रेल्वे खात्यास लाभले आहेत. पक्ष भेद विसरुनी मुंबईतील साऱ्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांसह पुढाकार घेऊन २०२३ या आगामी वर्षात मुंबईकरांना काही तरी मिळवून द्यावे जेणेकरून प्रवाशांना सुसह्य प्रवास आणि मनःशांती मिळेल. 


विजय आप्पा वाणी , पनवेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: