म. टा. दिनांक २० डिसेंबर २२ "विचार स्तंभातील" प्रा. डॉ. अशोक मोडक यांचा चिनी आव्हान पेलण्याची संधी सविस्तर लेख वाचला. भारत देशाची सीमा, अफगाणिस्थान, पाकिस्तान, चीन, नेपाळ, बांग्ला देश, म्यानमार, भूतान या सात देशांच्या उत्तरेकडील सीमेच्या लगत आहे. सातही देशांच्या तुलनेत चीन देश बलाढ्य आणि आर्थिक औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर आहे. या विरुद्ध पाकिस्तानची आर्थिक स्थिती अतिशय खालावलेली चिंताजनक आहे. चीन स्वबळावर आणि पाकिस्तान चीनच्या बळावर असे दोन्ही देश भारताच्या सीमा रेषेवर कायम कुरापती काढत असतात. लेखात म्हटल्याप्रमाणे भारताचे जी २० अध्यक्षपद, इंडो पॅसिफिक क्षेत्रातील वाढते प्रस्थ चीनला सहन होत नाही आणि वारंवार कुरापती काढत असतो. भारत देश दोन्ही ही देशांना उत्तर देण्यास समर्थ आहे पणं फक्त आक्रमण परतवून लावणे हेच करीत आहे . पण भारत स्वतः हल्ला चढवून त्यांना कायमचे नेस्तनाबूत करण्याचे धोरण न अवलंबिण्याचे कारण काहीही असो.
यात एक महत्वाचे विदित करावेसे वाटते की, दुसऱ्या महायुध्दा नंतर अमेरिका आणि युरोपातील देशांनी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) स्थापित करून युद्ध बंदीवर आक्रमक उपाय शोधून काढला आहे. या संस्थेच्या एकाही सदस्यावर आक्रमण झाले तर या संस्थेचे सैन्य मदतीस तत्पर असते. या भीतीनेच आपापसात युद्ध टाळले जात आहे. याच धर्तीवर भारतानेही हिंद महासागरातील, आशिया खंडातील समविचारी देशांची ट्रिटी ऑर्गनायझेशन स्थापित करून दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून सैन्यबळ आणि आधुनिकता युद्ध कौशल्य देखील वाढून पाकिस्तान, चीन या देशांची कायमची डोकेदुखी कमी होऊन युद्ध बंद होऊन जाऊन शांतता नांदेल.
विजय आप्पा वाणी,पनवेल.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा