रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

लेख (१२६) १८ सप्टेंबर २०२३



(१)

शासनाने कोकणवासीयांचे २०२४ गणपती उत्सवाचे नियोजन आतापासूनच करावे.

१७ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र टाइम्स अंकातील पहिल्या पानावरील "कोकणात गणपतीस जाताना "  वृत्त वाचले.  गेली अनेक दशके बहुतांशी कोकणवासीय गणपती निमित्ते कोकणात जात आहेत. पूर्वी केवळ एसटी द्वारे आणि १९९८ नंतर  कोकण रेल्वेची सुविधा, सोबतच स्वतःची वाहने आणि खाजगी ट्रॅव्हल्स प्रवासी साधने उपलब्ध झालीत.  अर्थातच या साऱ्यांचा परिणाम प्रवाशांच्या वाढीवर झाला.  तीन जिल्ह्यातील मिळून दोन अडीच हजार गावातील पाच ते सहा लक्ष ग्रामस्थ चतुर्थीच्या फक्त एक ते दोन दिवस आधी एकदमच प्रवासाला निघाल्यामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर प्रचंड ताण पडतो.  यावर उपाय म्हणून, फक्त आणि फक्त कोकण कोकणवासीयांसाठीच प्रत्येक तासाला एक या दराने सोळा डब्यांच्या चोवीस विशेष एक्स्प्रेस, सोडल्यास , एका एक्स्प्रेस मध्ये सरासरी पंधराशे प्रवासी धरल्यास चोवीस एक्स्प्रेसने छत्तीस हजार प्रवासी , तीन दिवसात लाखावर प्रवासी जातील.  रोडच्या प्रवासाचे, मिनिटाला एक याप्रमाणे चोवीस तासांच्या अंदाजे पंधराशे एसटीच्या प्रवासात सदूसष्ट हजार , तीन दिवसात दोन लक्ष प्रवासी जावू शकतात.   दिवसाला पाच हजार स्वतःच्या चार/सात सिटर ने गेल्यास पंचवीस हजार प्रवासी तीन दिवसात पंचाहत्तर प्रवासी. म्हणजे तीन दिवसात रेल्वेचे एक लक्ष आणि एसटीचे दोन लक्ष आणि चारचाकिंचे पंचाहत्तर हजार, असे एकूण चार लक्ष प्रवासी जावू शकतात.  ७ सप्टेंबर २०२४ रोजी पुढील वर्षी होणाऱ्या श्री आगमनाचे ४,५ आणि ६ सप्टेंबर २०२४ रोजींचे नियोजन , दिवसाला चोवीस रेल्वे, पंधराशे एसटी, पाच हजार चारचाकी वाहने असे करावे.  राज्य प्रशासनाने पालक मंत्रांच्या देखरेखीखाली मुख्य सचिव, तिन्ही जिल्हाधिकारी , सर्व पक्षीय खासदार, आमदार यांची संयुक्त समिती गठीत करून, रेल्वे, रस्ते प्रवासा सोबत, जलमार्गाने, हवाई मार्गाने प्रवासी वाहतूक होईल.  आतापासूनच रेल्वे बोर्डास अर्ज करून फक्त मुंबई मंडळासच आरक्षण करता यावे असे म्हणणे मांडावे.  ज्या कोकण वासीयांना प्रवास करावयाचा आहे, त्यांना क्यू आर कोड देण्यात यावा, त्यांनाच फक्त रेल्वे, एस टी आरक्षण देण्यात यावे.  सेच एस टी महामंडळ, रस्ते दुरुस्ती मंडळ, वाहतूक नियंत्रण विभाग यांना आदेश करून , मे , जून २०२४ पूर्वीच अंतिम आराखडा जनतेस जाहीर करावा. श्री गणराया शासनाला बुध्दी दे आणि कोकण वासियांचा खडतर प्रवास थोडा तरी सुखकर होऊ दे.


विजयकुमार वाणी, पनवेल.

(२)

शासनाने कोकणवासीयांचे २०२४ गणपती उत्सवाचे नियोजन आतापासूनच करावे.

१७ सप्टेंबर २०२३ लोकसत्ता अंकातील पहिल्या पानावरील "कोकणची बिकट वाट"  वृत्त वाचले.  गेली अनेक दशके बहुतांशी कोकणवासीय गणपती निमित्ते कोकणात जात आहेत. पूर्वी केवळ एसटी द्वारे आणि १९९८ नंतर  कोकण रेल्वेची सुविधा, सोबतच स्वतःची वाहने आणि खाजगी ट्रॅव्हल्स प्रवासी साधने उपलब्ध झालीत.  अर्थातच या साऱ्यांचा परिणाम प्रवाशांच्या वाढीवर झाला.  तीन जिल्ह्यातील मिळून दोन अडीच हजार गावातील पाच ते सहा लक्ष ग्रामस्थ चतुर्थीच्या फक्त एक ते दोन दिवस आधी एकदमच प्रवासाला निघाल्यामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर प्रचंड ताण पडतो. यावर उपाय म्हणून, ७ सप्टेंबर २०२४ रोजी पुढील वर्षी होणाऱ्या श्री आगमनाचे ४,५ आणि ६ सप्टेंबर २०२४ रोजींचे नियोजन , राज्य प्रशासनाने पालक मंत्रांच्या देखरेखीखाली मुख्य सचिव, तिन्ही जिल्हाधिकारी , सर्व पक्षीय खासदार, आमदार यांची संयुक्त समिती गठीत करून, रेल्वे, रस्ते प्रवासा सोबत, जलमार्गाने, हवाई मार्गाने जास्तीत जास्त प्रवासी वाहतूक होईल याचा अभ्यास करावा.  आतापासूनच रेल्वे बोर्डास अर्ज करून, लागोपाठ तीन दिवस,  २४ तासात २४ विशेष एक्स्प्रेस , मुंबई विभागातून सोडण्यात याव्यात.  फक्त मुंबई मंडळासच आरक्षण करता यावे असे म्हणणे मांडावे.  ज्या कोकण वासीयांना प्रवास करावयाचा आहे, त्यांना क्यू आर कोड देण्यात यावा, त्यांनाच फक्त रेल्वे, एस टी आरक्षण देण्यात यावे.  तसेच एसटी महामंडळ, रस्ते दुरुस्ती मंडळ, वाहतूक नियंत्रण विभाग यांना आदेश करून , मे , जून २०२४ पूर्वीच अंतिम आराखडा जनतेस जाहीर करावा. श्री गणराया शासनाला बुध्दी दे आणि कोकण वासियांचा खडतर प्रवास थोडा तरी सुखकर होऊ दे.

विजयकुमार वाणी,  पनवेल 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: