पत्रकारिता लोकशाहीचा आधार !!
दिनांक १२ सप्टेंबर २०२३, महाराष्ट्र टाइम्स "नाही मी बोलत " संपादकीय वाचले . समर्पक मथळा, वेगवेगळ्या संदर्भात देशाच्या पंतप्रधानांचे पत्रकारीते बद्दल असेलला आकस याचे योग्य वर्णन केले आहे. विविध कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या माध्यमात विशेषतः टिव्ही , सोशल मीडियावर साधारणतः सामान्य जनांना रोज, देशाचे पंतप्रधान कोणत्या न कोणत्या कार्यक्रमात दिसतातच . महिन्याला मन की बात सह , पंतप्रधानांची उपस्थिती असणारा प्रत्येक कार्यक्रम भव्य दिव्य नेत्रदीपक असतो , भारावून जावून , सहस्त्रावधी जनतेला त्यांच्या वक्तृत्वाच्या शैलीविषयी, त्यांच्या कार्याविषयी विशेष आकर्षण निर्माण झालेले आहे . परंतु देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या दशकभरात एकही पत्रकार परिषद घेतली नाही, या तक्रारीत सुद्धा तथ्य आहे असे वाटते . देशाच्या अर्थात आता विश्वाच्या उच्चस्थरीय नेत्याची मुलाखत घेणे , त्यांना प्रत्यक्ष बघणे , विविध प्रश्नांमधून त्यांचे वैयक्तिक मत , पक्षाचे मत , देशाचे मत विचारणे , यात पत्रकारितेचा कस , कसब दाखविण्याची संधी काँग्रेस कार्यकाळात मध्यम वयाच्या परंतु आता ज्येष्ठ असलेल्या पत्रकारांना नक्कीच बोचत असणार . त्यांच्या अपेक्षा कधी पूर्ण होतील प्रत्यक्ष विश्वगुरूच जाणे . पत्रकारितेने लोकशाही टिकविण्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे . सत्ताधारी असोत किंवा विरोधक त्यांच्या निरंकुश आचार विचारांवर अंकुश ठेवण्याचे एक विश्वासार्ह शस्त्रास्त्र म्हणून वापरले आहे . "नाही मी बोलत " या शब्दांनी सं मानापमानातील गीताची नक्कीच आठवण झाली. " विनयहीन वदता नाथा नाही मी बोलत " .
विजयकुमार वाणी , पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा