गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३
लेख (१३०) २९ सप्टेंबर २०२३
मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३
प्रत्येक शहराला चेहरा असतो आणि एसटी बस डेपो आणि रेल्वे स्टेशन इथूनच शहराची सुरुवात होते. परंतु या दोन्ही केंद्र आणि राज्य शासनाचे दोन्ही विभाग अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. मनपा आयुक्त यांच्याशी संपर्क करून स्वच्छ आणि सुंदर परिसर करून घ्यावा. यावर मनपा आयुक्तांनी दोन्हीही परिसर स्वच्छ योजने अंतर्गत घेतले असून, येत्या तीन महिन्यात बदल दिसून येतील असे सांगितले.
लेख (१२९) २७ सप्टेंबर २०२३
(१)
महोदय , २६ सप्टेंबर २०२३ मटा अंकातील, अल्प काळातील धुवांधार पावसाने उडविलेला हाहाकार, याचे वर्णन "नागपुरी दैना " संपादकीयात वाचले. राज्याचा विचार केला असता , क्षेत्रीय नगर नियोजन अधिनियम कायदा, रिजनल प्लॅन, स्थानिक वैधानिक महामंडळे, मेगासिटीज , स्मार्टसिटीज , अशा अनेक योजनांचे नियोजन केले पण ते प्रभावीपणे अंमलात आले नाही . शहर नियोजन, स्थापत्य अभियांत्रिकी , वास्तुशास्त्र , राजकीय इच्छाशक्ती आणि लोकसहभागाचा समावेश, यावर सारे गणित अवलंबून आहे . शहरांचे बदल लक्षात घेता , अद्ययावत नकाशे तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर , वर्तमान गरज पूर्ण करताना, पुढील पिढ्यांच्या क्षमतेशी तडजोड न करता नियोजन करणे ,सामाजिक चळवळ निर्माण होऊन, पुरेशी स्वच्छता , वाहतूक व्यवस्था, सुविधा , आर्थिक प्रगतीचा मागोवा , पर्यावरणीय संवेदशीलता , सौंदर्यविषयक धोरण, खाजगी क्षेत्राचा प्रभाव आणि राजकीय विचारांपासून दूर, या साऱ्यांचा विचार प्रतीक्रीयेतून मास्टर प्लॅन तयार होणे आवश्यक आहे . शहरांच्या सरंचनेत, व्यवस्थेत, कार्यक्षमता वाढविण्याची गरज धोरण निर्मात्यांना जाणविली नाही . केवळ वाढलेल्या रहिवाशी क्षेत्राला सरंक्षित कसे करायचे, मतपेढी कशी वाढवायची याचे अप्रत्यक्षरीत्या निर्धारण केले , यात मूळ शहराच्या गाभ्याचे मरण कधी झाले याचा सुगावा न लागल्यामुळे बकालपणा , भोंगळपणा , बेदरकारपणा उकिरड्यांच्या रूपात प्रतींबिंबित होऊ लागला . अनेक पालिकांमध्ये कर्मचारी, अधिकाऱ्यांची कमतरता काँट्रॅक्ट, प्रतिनियुक्तीत कशी बशी ढकलली जात आहे , ज्यांना शहरांशी काहीही देणे घेणे नसते . प्रादेशिक मंडळे , सचिवालयातील जबाबदार अधिकारी वर्ग , वरचेवर होणाऱ्या सत्ताबदलास कंटाळले आहेत . कधी धोरण लकवा तर कधी धोरणांचा सुळसुळाट, अशा परिस्थतीत काम करावे लागत असल्यामुळे, अकार्यक्षमता निर्माण होत आहे . अशा अनेक घटनांनी, बेजबाबदार धोरणकर्त्यांनी राज्यातील प्रत्येक शहराची , तालुक्याची , गावाची दुर्दशा मांडलेली आहे , परिणामी , निसर्गास जबाबदार म्हणून सुटका करून घेणे योग्य नाही .
(२)
१८ सप्टेंबर २०२३ लोकसत्ता अंकातील संपादकीय "भंगती शहरे, दुभंगता विकास !" वाचले. जगभरात गेल्या दोन शतकाहूनही अधिक विशेषतः अमेरिका , युरोपातील देशांमध्ये "शहर नियोजन" बऱ्याच अंशी स्थानिक आर्थिक आणि पर्यावरणीय गरजांवर आधारित विविध पद्धतीने राबविले जाते . निसर्गाचा संतुलित विकास, ग्रामीण भागात विकास , प्रभावी वाहतूक व्यवस्था, जमिनीचा वापर ( विकासात्मक आणि पर्यावरणातील क्षेत्र विकास) हे सर्व राष्ट्रीय, क्षेत्रीय आणि स्थानिक पातळीवर ठरविले जाते . परिणामी परदेशातील असंख्य शहरे नियोजित, शाश्वत विकासाच्या प्रगतीपथावर आहेत .
शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३
लेख (१२८) २४ सप्टेंबर २०२३
"शासनाच्या दरवर्षीच्या अर्थ संकल्पाचे प्रत्येक महिन्यास ऑडिट व्हावे ."
महोदय, दिनांक २३ सप्टेंबर २०२३ लोकसत्ता अंकातील अन्यथा सदरातील " मग सरकार काय करते ? " स्तंभ लेख वाचला . प्रस्तुत लेखात शासनाच्या विविध खात्यातील, निधीतील कमतरते मुळे सोयी सुविधांची असलेली वानवा यावर प्रकाश टाकला आहे . राज्याचा स्वतःचा अर्थसंकल्प सहा लक्ष कोटींचा , त्यात ३६ जिल्हा परिषद, २९ महापालिका , २२५ नगरपरिषद , यांचा उत्पन्नांच्या स्रोतांवर आधारित प्रत्येकाचा अर्थसंकल्प. या साऱ्या निधीतून विविध खात्यांच्या मागण्या , प्रकल्प , शेती , पायाभूत सुविधा , उद्योग , आरोग्य , शिक्षण ,आर्थिक दुर्बल घटक या सर्वांचा प्रामुख्याने विचार केला जातो. दरवर्षी सादर होणाऱ्या अर्थ संकल्पाचे निधी वितरण , त्याचा प्रत्यक्ष विनियोग कशा प्रकारे होतो, याचे लेखा परीक्षण वैगेरे नियमित होणे आवश्यक आहे . आधीच्या निधीच्या विनियोगाचे लेखा परीक्षण सादर केल्याशिवाय पुढील निधीचे वाटप होऊ नये, असे निर्बंध घातल्यास आर्थिक शिस्त निर्माण होईल. सामान्यांच्या भरलेल्या कारांवरच शासन कारभार चालतो .
गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३
लेख (१२७) २१ सप्टें २०२३
"सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिक्त जागा चिंताजनक विषय "
रविवार, १७ सप्टेंबर, २०२३
लेख (१२६) १८ सप्टेंबर २०२३
(१)
शासनाने कोकणवासीयांचे २०२४ गणपती उत्सवाचे नियोजन आतापासूनच करावे.
१७ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र टाइम्स अंकातील पहिल्या पानावरील "कोकणात गणपतीस जाताना " वृत्त वाचले. गेली अनेक दशके बहुतांशी कोकणवासीय गणपती निमित्ते कोकणात जात आहेत. पूर्वी केवळ एसटी द्वारे आणि १९९८ नंतर कोकण रेल्वेची सुविधा, सोबतच स्वतःची वाहने आणि खाजगी ट्रॅव्हल्स प्रवासी साधने उपलब्ध झालीत. अर्थातच या साऱ्यांचा परिणाम प्रवाशांच्या वाढीवर झाला. तीन जिल्ह्यातील मिळून दोन अडीच हजार गावातील पाच ते सहा लक्ष ग्रामस्थ चतुर्थीच्या फक्त एक ते दोन दिवस आधी एकदमच प्रवासाला निघाल्यामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर प्रचंड ताण पडतो. यावर उपाय म्हणून, फक्त आणि फक्त कोकण कोकणवासीयांसाठीच प्रत्येक तासाला एक या दराने सोळा डब्यांच्या चोवीस विशेष एक्स्प्रेस, सोडल्यास , एका एक्स्प्रेस मध्ये सरासरी पंधराशे प्रवासी धरल्यास चोवीस एक्स्प्रेसने छत्तीस हजार प्रवासी , तीन दिवसात लाखावर प्रवासी जातील. रोडच्या प्रवासाचे, मिनिटाला एक याप्रमाणे चोवीस तासांच्या अंदाजे पंधराशे एसटीच्या प्रवासात सदूसष्ट हजार , तीन दिवसात दोन लक्ष प्रवासी जावू शकतात. दिवसाला पाच हजार स्वतःच्या चार/सात सिटर ने गेल्यास पंचवीस हजार प्रवासी तीन दिवसात पंचाहत्तर प्रवासी. म्हणजे तीन दिवसात रेल्वेचे एक लक्ष आणि एसटीचे दोन लक्ष आणि चारचाकिंचे पंचाहत्तर हजार, असे एकूण चार लक्ष प्रवासी जावू शकतात. ७ सप्टेंबर २०२४ रोजी पुढील वर्षी होणाऱ्या श्री आगमनाचे ४,५ आणि ६ सप्टेंबर २०२४ रोजींचे नियोजन , दिवसाला चोवीस रेल्वे, पंधराशे एसटी, पाच हजार चारचाकी वाहने असे करावे. राज्य प्रशासनाने पालक मंत्रांच्या देखरेखीखाली मुख्य सचिव, तिन्ही जिल्हाधिकारी , सर्व पक्षीय खासदार, आमदार यांची संयुक्त समिती गठीत करून, रेल्वे, रस्ते प्रवासा सोबत, जलमार्गाने, हवाई मार्गाने प्रवासी वाहतूक होईल. आतापासूनच रेल्वे बोर्डास अर्ज करून फक्त मुंबई मंडळासच आरक्षण करता यावे असे म्हणणे मांडावे. ज्या कोकण वासीयांना प्रवास करावयाचा आहे, त्यांना क्यू आर कोड देण्यात यावा, त्यांनाच फक्त रेल्वे, एस टी आरक्षण देण्यात यावे. तसेच एस टी महामंडळ, रस्ते दुरुस्ती मंडळ, वाहतूक नियंत्रण विभाग यांना आदेश करून , मे , जून २०२४ पूर्वीच अंतिम आराखडा जनतेस जाहीर करावा. श्री गणराया शासनाला बुध्दी दे आणि कोकण वासियांचा खडतर प्रवास थोडा तरी सुखकर होऊ दे.१७ सप्टेंबर २०२३ लोकसत्ता अंकातील पहिल्या पानावरील "कोकणची बिकट वाट" वृत्त वाचले. गेली अनेक दशके बहुतांशी कोकणवासीय गणपती निमित्ते कोकणात जात आहेत. पूर्वी केवळ एसटी द्वारे आणि १९९८ नंतर कोकण रेल्वेची सुविधा, सोबतच स्वतःची वाहने आणि खाजगी ट्रॅव्हल्स प्रवासी साधने उपलब्ध झालीत. अर्थातच या साऱ्यांचा परिणाम प्रवाशांच्या वाढीवर झाला. तीन जिल्ह्यातील मिळून दोन अडीच हजार गावातील पाच ते सहा लक्ष ग्रामस्थ चतुर्थीच्या फक्त एक ते दोन दिवस आधी एकदमच प्रवासाला निघाल्यामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर प्रचंड ताण पडतो. यावर उपाय म्हणून, ७ सप्टेंबर २०२४ रोजी पुढील वर्षी होणाऱ्या श्री आगमनाचे ४,५ आणि ६ सप्टेंबर २०२४ रोजींचे नियोजन , राज्य प्रशासनाने पालक मंत्रांच्या देखरेखीखाली मुख्य सचिव, तिन्ही जिल्हाधिकारी , सर्व पक्षीय खासदार, आमदार यांची संयुक्त समिती गठीत करून, रेल्वे, रस्ते प्रवासा सोबत, जलमार्गाने, हवाई मार्गाने जास्तीत जास्त प्रवासी वाहतूक होईल याचा अभ्यास करावा. आतापासूनच रेल्वे बोर्डास अर्ज करून, लागोपाठ तीन दिवस, २४ तासात २४ विशेष एक्स्प्रेस , मुंबई विभागातून सोडण्यात याव्यात. फक्त मुंबई मंडळासच आरक्षण करता यावे असे म्हणणे मांडावे. ज्या कोकण वासीयांना प्रवास करावयाचा आहे, त्यांना क्यू आर कोड देण्यात यावा, त्यांनाच फक्त रेल्वे, एस टी आरक्षण देण्यात यावे. तसेच एसटी महामंडळ, रस्ते दुरुस्ती मंडळ, वाहतूक नियंत्रण विभाग यांना आदेश करून , मे , जून २०२४ पूर्वीच अंतिम आराखडा जनतेस जाहीर करावा. श्री गणराया शासनाला बुध्दी दे आणि कोकण वासियांचा खडतर प्रवास थोडा तरी सुखकर होऊ दे.
विजयकुमार वाणी, पनवेल
बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३
लेख (१२५) १५ सप्टेंबर २०२३
पर्यायी इंधनाचा वापर मंत्री महोदयांच्या दमदार वृत्तीनेच शक्य आहे .
मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३
लेख (१२४) १३ सप्टेंबर २०२३
बैठकांचे सत्र नको नियोजन हवे !
सामना दिनांक १३ सप्टेंबर २०२३ संपादकीय " खोकी खर्ची पडतील काय? शेतकऱ्यांच्या आत्महत्या ! " वाचले. लेखात शेतकऱ्यांच्या आत्महत्या , पावसाने ओढ दिल्याने पिकांवर पर्यायाने शेतकऱ्यावर झालेल्या परिणामांची मीमांसा केली आहे. सरकारवर टिकेचा आसूड ओढतानाच, चार गोष्टी पणं कराव्यात याची आठवण देखील केली आहे. दिड ते पावणे दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मराठवाड्यात जाऊन मंत्रिमंडळाची बैठक घेण्यापेक्षा, मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील ७६ तालुक्यांतील एकूण शेतकऱ्यांची संख्या, ओलिताखाली असलेली जमीन, बी बियाण्यांचे वाटप, पिण्याच्या पाण्याची स्थिती, जनावरांच्या चाऱ्याची गरज, आदी शेती पूरक गोष्टींची माहिती घेऊन या शेतकऱ्यांना तातडीची मदत, सहाय्य करून पूर्तता केल्यास लेखात म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण नक्कीच थांबू शकते. मंत्रिमंडळ बैठक, दुष्काळ जाहीर झाल्यावर बांधावर जाणे, अल्पसे पॅकेज जाहीर करणे, वैगेरे फाफट पसाऱ्यात न अडकता, गावागावांतून प्रत्येक शेतकऱ्याची नोंद घेऊन त्यास सहाय्य करावे, जेणेकरून दुर्लक्षित मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि सरकारच्या पदरी थोडे तरी पुण्य जमा होईल.
विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल.
लेख (१२३) १२ सप्टेंबर २०२३
शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३
लेख (१२२) १३ सप्टेंबर २०२३
(१)
आरक्षण आणि मानसिकता !
लोकसत्ता दिनांक १२ सप्टेंबर २०२३ चे संपादकीय " हे अपत्य कोणाचे ? आणि या आधीचे याच विषयावरील लेख
"संघ आणि आरक्षण" वाचले. दोन्ही संपादकीय लेखात म्हटल्याप्रमाणे, बेरजेच्या राजकारणाचा भाग म्हणून आरक्षण मुद्द्याकडे पाहिले जाते. काँग्रेसच्या काळातील आरक्षणच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष आणि आरएसएस पर्यायाने भाजपाचे जातपातीच्या आरक्षणातील रसाचे राजकारण सर्वश्रुत आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर विशेषतः गेल्या २५ वर्षांपासून, सर्वच जातीच्या, ज्ञाती समाजात स्थित्यंतरे झालीत, शिक्षणाचे प्रमाण वाढल्यामुळे घरटी एकजण सरकारी, खाजगी, नोकरी व्यवसायात सामावला गेला, परिणामी कुटुंबाचा आर्थिक स्थरही रुंदावत गेला. सरकारी नोकरीच्या पणं संधी वाढू लागल्यात. पण तरीही कधी सत्ताधाऱ्यांनी तर कधी विरोधकांनी आरक्षण विषय पेटवित ठेवला. त्यासाठी दोन्हीही बाजू सकारात्मक राहिल्या नाहीत.
यावर उपाय म्हणून, राज्य शासनाने, आजच्या आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करताना, सन २००० ते २०२२ अखेर, बावीस वर्षात, आरक्षणाच्या माध्यमातून किती आणि कोणत्या वर्गवारीच्या उमेदवारांच्या नियुक्त्या केल्यात, याचे स्टेटस्टिकस् काढावे. यामुळे वर्गवारीतील प्रत्येक जातीस किती न्याय मिळाला याचे चित्र स्पष्ट होईल. लेखातील दुसरा महत्वाचा मुद्दा २०२१ पासून केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे होत नसलेल्या जातीनिहाय जनगणनेचा. पण केवळ केंद्रावर न ढकलता , राज्य सरकारही जातीनिहाय जनगणना करू शकते याचे उत्तम उदाहरण बिहार, ज्यांनी हे करून दाखविले (आपले राज्यकर्ते फक्त जिरून दाखविल्याचा आविर्भावात जगत आहेत) . अशा पद्धतीने पुढाकार घेऊन राज्याने त्वरित डिसेंबर २०२३ अखेरच्या आत, मोबाईल ॲपच्या माध्यमातून, नागरिकांकडून
विजयकुमार वाणी, पनवेल
आरक्षण आणि मानसिकता !
लोकसत्ता दिनांक ८ सप्टेंबर २०२३ संपादकीय "संघ आणि आरक्षण" वाचले. प्रस्तुत लेखात संघाची, पर्यायाने भाजप आणि जनमानसाचा बघण्याचा दृष्टीकोन विस्तृत केले आहे. लेखातील दुसरा महत्वाचा मुद्दा जनगणना आणि आरक्षण यांचे योग्य विश्लेषण केले आहे. यात संघाला महत्वाची आहे, ती दोन हजार वर्षांपासूनची जात सरंचना, जी आजतागायत आहे. विषमता दूर करण्यासाठी सहस्त्र संतांनी प्रयत्न केलेत, परिस्थितीत तसूभर पणं फरक पडला नाही. उलटपक्षी आरक्षणामुळे हा जातीयवाद जास्तच अधोरेखित झाला. पहिल्या बाजूत शाळांमध्ये, वसाहतीत, प्रवासात, नोकरीत, संस्थांमध्ये, पहिल्या भेटीतील सवांदात नाव विचारले जाते, नावावरून विशेष बोध झाला नाही तर गाव विचारले जाते. नाव, आडनाव , गावावरून, जाती , आहार, राहणीमान, बुदध्यांकाचा विचार झाल्यावरच संबंध प्रस्थापित होतात. जातपातीची खरी मानसिकता इथूनच सुरू होऊन त्याची विषवल्ली फोफावली जाते. दुसऱ्या बाजूस, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा, नोकरीच्या स्पर्धात्मक परीक्षा, नोकरीतील सेवाज्येष्ठता नियमानुसार पदोन्नती यातील आरक्षणाच्या मुद्द्याने डावलले जाणे सामान्यांना जीवघेणे ठरते. प्रस्तुत लेखात जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरण्यात आला आहे. नुकतीच बिहार राज्याची जातीनिहाय जनगणना पूर्ण झालेली आहे, त्याच धर्तीवर आधुनिक पद्धतीने मोबाईल ॲप द्वारा, जनगणना करून, स्त्री पुरुष , वयोमान, साक्षरता, नोकरी , बेरोजगारी यांचे प्रमाण उपलब्ध होईल. ह्या डेटा चा उपयोग मुख्यतः आरक्षणाचा मुद्दा, जाती जमातीतील संख्येच्या अनुसार सुधारित सरंचना अंमलात आणून, प्रवेश, नियुक्ती, पदोन्नती, साठी वापरता येईल. या मुद्द्यांत एक महत्वाचा प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा सुद्धा निर्दिष्ट करावासा वाटतो. फक्त नियोजित प्रकल्पापुरताच नियुक्तीसाठीच प्रकल्पग्रस्त दाखला वापरल्यावर तो रद्द करण्यात येतो. पदोन्नती साठी, अथवा निवृत्तीनंतर पाल्याला वापरता येत नाही, पाल्य सर्वसाधारण वर्गात मोडला जातो. सुधारित आरक्षण व्यवस्थेत याचा विचार व्हावा. यासह, सर्वच जातींच्या रिक्त जागांवर मराठा समाजाला प्राधान्य दिल्यास सहस्रावधी उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रश्न सुटेल तेव्हा सुटेल, जी आर, वटहुकूम, यात अडकून न राहता,
विजयकुमार वाणी, पनवेल
सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३
लेख (१२१) ५ सप्टेंबर २०२३.
आरक्षण राज्याचे अपयश का दुर्लक्ष !
दिनांक ४ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र टाइम्स अंकातील "महाराष्ट्र पेटवू नका " संपादकीय वाचले. आरक्षणाची प्रत्यक्ष स्थिती, शासनाची कृती आणि समाजाच्या अपेक्षा याचे योग्य चित्रण प्रस्तुत लेखात केले आहे. यातील सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र पेटवू नका, हे आहे. राज्य स्थापने पासून ६० वर्षांच्या इतिहासात मराठा समाज गत ३० वर्षे सगळ्याच सरकार विरुद्ध आरक्षणाचा लढा देत आहे. पणं दुर्देवाने सगळ्याच सरकारांनी दुर्लक्ष करून पळवाट शोधली. या पाठीमागे मोठे कट कारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक क्लृप्त्या लढविल्या पणं मार्ग काही मिळत नाही. यात एक मार्ग काढता येऊ शकतो, गेल्या ६० वर्षात आरक्षण माध्यमातून जातीनिहाय टक्केवारीचे सर्वेक्षण करावे. यात ज्या जातीतून पुरेसे,अपेक्षित संख्याबळ मिळत नसेल तर तो कोटा रिक्त न ठेवता, मराठा समाजाला देण्यात येण्याची सुरुवात करावी. जेणेकरून मराठा समाजाला जातीनिहाय टक्केवारीत स्थान मिळण्यास सुरवात होईल. न्यायालयीन लढाई, आयोग, वटहुकूम वैगेरे कामकाजात आतापर्यंत पंचवीस तीस वर्षांचा कालावधी लोटला आहे, त्यात मार्ग निघेल तेव्हा निघेल, त्या दरम्यान छोटासा प्रयोग करून बघावा.विजयकुमार वाणी, पनवेल.






