सल्लाबाजार अर्थात त्यांच्याच फायद्यासाठी !!
लोकसत्ता दिनांक २७ मे २०२३ च्या बुकमार्क सदरातील "सल्लाबाजार " कितपत फायद्याचा ? सागर अत्रे यांचे दोन पुस्तकांचे परीक्षण वाचले. लेखात परदेशी कंपन्यांना आलेले अनुभव आणि कन्सल्टेशन कंपन्यांचे खरे दायित्व संबधी खुलासा केला आहे . लेखात म्हटल्याप्रमाणे या प्रतिष्ठित कंपन्यात नेते ,सनदी अधिकारी यांनी काम केले आहे आणि उत्तरोत्तर प्रगतीच्या शिखरावर पोहोचले आहेत. गेल्या दशकापासून भारतात , केंद्र सरकारच्या मंत्रालयात , सार्वजनिक उपक्रमांतील अनेक नवे नवे प्रकल्प बांधा वापरा हस्तांतर तत्वावर उभारणीसाठी मंजुरी देण्यात आल्यात. हे सर्व प्रकल्प सर्वच दृष्ट्या मोठे असल्याकारणाने, फिजिबिलिटी रिपोर्ट, ड्राफ्ट प्रोजेक्ट रिपोर्ट, स्वारस्य, निविदा प्रक्रिया , मूल्यमापन , करार हे सारे काम वेळेत करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ बऱ्याच उपक्रमात , खात्यात उपलब्ध नसल्या कारणाने केंद्र सरकारनेच काही ठराविक कन्सल्टेशन कंपन्यांचे सहकार्य घेण्याचे सुचविले . नॉमिनेशन बेसिस वर काम मिळाल्यावर , कन्सल्टेशन कॉर्पोरेट एक्सक्युटिव्हज , सरकारच्याच वेगवेगळ्या खात्यातील अधिकार्यांच्या संपर्कात राहून माहिती मिळवतात . ती माहिती एकत्रित करून, कॉम्पुटर प्रोग्रॅमिंग नॉलेज , इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, उत्कृष्ट वेशभूषा द्वारे पीपी प्रेझेन्टेशन, द्वारे सादर करतात . जे काम सरकारी खात्यातून सुद्धा होत असे, होऊ शकते , तेच काम फक्त वेगळ्या धाटणीने, एकत्रित सादर करण्याचे कसब यांना गवसले आणि या कंपन्यांनी आपले कार्मिक,आर्थिक, नाव लौकीक बस्तान बसवून ठसा उमटविला . दुसरे महत्वाचे इथे नमूद करावेसे वाटते , या साऱ्या कन्सल्टेशन कंपन्यांत राजकीय नेत्यांचे , उच्च अधिकाऱ्यांचे सुपुत्र , प्रक्षिशणाच्या नावे कार्यरत असतात, त्याचाही परिणाम याच कंपन्यांना काम देण्यात यावे असा आग्रही होत असेल . लेखातील शेवटच्या परिच्छेदात कन्सल्टेशन कंपन्यांचे कामाचे लूप होल्स दाखविले आहेत. आपल्या देशातील विशेषतः सरकारी खात्यातील सारेच प्रकल्प पूर्णत्वास जातात असे नाही ,स्मार्ट सिटी, इनलँड वॉटर सर्व्हिसेस , प्रत्येक तालुक्यात एअरपोर्ट, ड्राय पोर्ट्स , कॉरिडॉर्स , वैगेरे असे कित्येक प्रकल्प कागदावरच राहतात. शिवाय या सर्व कामात सरकारी अधिकारी निश्चित निवांत असतात कारण प्रकल्प झाला नाही झाला याची चौकशी , ऑडिट वैगेरे होत नाही , कारण सरकारच्या सल्ल्यानुसारच कन्सल्टेशन कंपन्यांना काम दिले जाते. पण इकडे कंपन्यांचे कन्सल्टेशन कतृत्व सिद्ध झाले नाही झाले तरी त्यांच्यात आर्थिक उन्नती नक्कीच होत राहते .
विजयकुमार वाणी , पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा