दर्जेचे निकष योग्य आहेत का ?
महाराष्ट्र दिनी मराठीच्या अभिजात भाषा दर्जेसाठी राज्यपालांनी प्रयत्न होत असल्याचे सांगितले, सोबतच राज्यात लेखक, साहित्यिकांनी विविध ठिकाणी अद्याप पावेतो दर्जा न मिळाल्याने निषेध केला असे वृत्त आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. यातील संस्कृत भाषा वगळल्यास, दक्षिण भारतातील चारही राज्यांच्या भाषांना आणि पूर्वेकडील ओडिसा राज्याला दर्जा मिळाला आहे. अभिजात भाषेचा दर्जा फक्त दक्षिणेतील राज्यातील भाषांना मिळाला आहे यात थोडेसे वावगे वाटते. कारण भारताच्या २१ भाषा या अधिकृत भाषा आहेत, त्यात हिंदी भाषिक पट्टा खूप मोठा आहे. गुजराती, मराठी, बंगाली , काश्मिरी, उर्दू आणि पौर्वात्य भागातील स्थानिक भाषा यांचा वापर आहे. या भाषांना दर्जाच्या निकषानुसार , प्राचीन, श्रेष्ठ साहित्य, हजाराच्या वरचे आयुष्य, स्वयंभूपण, आधुनिक रूप , या कशातच मोडत नाही का ? याचा विचार उर्वरित सर्वच राज्यांनी करावा आणि मराठी भाषे साठी तर ऐतिहासिक दाखले, पुरावे यांची विपुलता सर्वदूर ख्याती आहे. फक्त आता निकषांचे मुद्दे तपासून पहावेत.
विजयकुमार वाणी, पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा