बहिष्कार टाकून अपशकून तर करून घेत नाही ना !!
नव्या संसद भवनाच्या उद्धघाटनास राष्ट्रपतींना निमंत्रण नसल्याच्या निषेधार्थ २० राजकीय पक्षांनी बहिष्कार घातल्याचे वृत्त आहे. संसद हे लोकशाही मार्गाने चालणाऱ्या देशााचे विधिमंडळ आहे. निवडणुकीच्या मार्गाने निवडून आलेले सदस्य आपापल्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतात. संसदीय राज्यपद्धतीमध्ये पंतप्रधान हा संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा प्रमुख असतो. मंत्रीमंडळ सरकारची धोरणे व प्रस्ताव संसदेसमोर मांडतात. साऱ्या पक्षांच्या नेत्यांना, सदस्यांना हे अवगत आहेच. शिवाय नव्या संसद भवनात पुढील अधिवेशनात सहभागी होणे आहेच, किंवा आता सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत बहिष्कार जरी घातला तरी नव्या लोकसभेत या साऱ्यांची सत्ता आल्यास मग नव्या संसदेत न जाता, जुन्याच संसदेत कामकाज करणार का ? याचे भान या सदस्यांना असणे आवश्यक आहे. निष्कारण विरोध करून स्वतःलाच स्वगृही जाण्यास रोखून स्वतःच्या सत्तेस अपशकून करण्यासारखे आहे, त्यापेक्षा सहभागी व्हावे, नव्या संसदेत मौज मजा आनंद व्यक्त करावा, घर लाभले तर पुढील सत्ता येण्यास वेळ लागणार नाही.
विजयकुमार वाणी पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा