(१)
एलआयसीचे योगक्षेम ? पण सामान्यांचा लोकक्षोभ !!!
१८ मे लोकसत्ता मुखपृषठावरील वृत्त " एलआयसी भागधारकांना अडीच लाख कोटींचा फटका" आणि १९ मे चे संपादकीय "लाखाचे बारा हजार " वाचले . गेल्या वर्षीच्या मे (२०२२) महिन्यातच एलआयसी ने भारतीय बाजारातील सर्वात मोठा आयपीओ काढून २१००० कोटींची गुंतवणूक उभी केली. देशातल्या सर्व म्युच्युअल फंडात जितकी गुंतवणूक होते त्यातली निम्मी गुंतवणूक एलआयसीची असते. खरे म्हणजे म्युच्युअल फंड हा सामान्यांसाठी कर बचत, गंगाजळी निर्माण करणे, नियमित उत्पन्न मिळवणे, इ. उदिष्टे साध्य होते, म्हणून प्राधान्य देतात. एलआयसीने विशेष आर्थिक लाभासाठी खुल्या शेअर बाजारात अदानी समूहाच्या पाच कंपन्यांमध्ये ९ टक्के हिस्श्याने ३० हजार कोटींची गुंतवणूक केली. परंतु जानेवारी २०२३ मध्ये हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीच्या अहवालानुसार, अदानी स्टॉकच्या किंमतीत फेरफार आणि मणी लॉन्डरिंगचे आरोप झालेत . अदानी कंपनीच्या सर्व शेअर्स सोबत एलआयसीचे शेअर मूल्य निम्म्यांवर आले. भांडवली बाजारातील एलआयसीमध्ये गुंतवणुक ही केवळ सरकारी इश्यू आहे म्हणून केली गेली . पणं एलआयसीने खाजगी क्षेत्रात गुंतवणक करून, लक्षावधी सामान्य गुंतवणुकदारांचे नुकसान, विशेषतः निवृत्त धारकांचा विश्वासघात केला. योगक्षेम वहाम्यहम या ब्रीद वाक्याचे पाट्या झळकणार्या एलआयसी, आता लोकक्षोभास पात्र आहे . केवळ शेअर बाजारातील गुंतवणूकीचे मूल्य बाजारातील चढ उतारावर अवलंबून असल्यामुळे हा लोकक्षोभ अनावर होत नाही एवढेच . सरकारी मालकीची एलआयसी आणि सरकारच्या मित्रांची अदानी , या चक्रव्यूहात सामान्यांना अडकविणे कितपत योग्य आहे , कमीत कमी एलआयसीचे समभाग संतुलित ठेवण्यापुरती तरी काळजी घेण्याचे या सरकारने करावे, जेणेकरून सामान्यजन खरेदी भावात हे शेअर्स विकून मोकळे तरी होतील.
विजयकुमार वाणी, पनवेल
(२)
एलआयसीने खाजगी क्षेत्रातील गुंतवणक परत घ्यावी.
आजच्या १८ मे २०२३ लोकसत्ता मुखपृषठावरील एल आय सी भागधारकांना अडीच लाख कोटींचा फटका लेख वाचला. सामान्य माणसाने सरकारी आयपीओ म्हणून एलआयसीत गुंतवणुक केली. रू.९०३ भावाने प्रत्येकी ७७ शेअर्स अदा केलेत, परंतू रू.८२६ भावाने लिस्टिंग होऊन सुरवाीतीस १० टक्के नुकसान झाले. गत वर्षभरात आकडा खालीच राहिला त्यात, अदानीतील खाजगी गुंतवणुकीने तर ५० टक्के तळ गाठून सामान्य माणसाचे निम्म्याहून अधिक नुकसान केले. अशा लक्षावधी गुंतवणुकदारांचे कोट्यवधींचे नुकसान एलआयसीने केले आहे. भांडवली बाजारातील एलआयसीत गुंतवणुक ही केवळ सरकारी म्हणून झाली पणं खाजगी क्षेत्रात गुंतवणक करून सामान्य माणसांना विशेषतः निवृत्त धारकांचा विश्वासघात केला आहे. अदानीने आयपीओ परत घेऊन गुंतवणकदारांचे पैसे परत केले होते, तसेच एलआयसीने खाजगी क्षेत्रातील गुंतवणक परत घेऊन सामान्यांचे पैसे परत करावेत किंवा समभाग संतुलित अवस्थेत ठेवावा.
विजयकुमार वाणी, पनवेल
(३)
अपात्र आमदारांच्या संदर्भात विधान सभा अध्यक्ष यांची पत्रकार परिषद.
राज्यातील सत्ता संघर्षाच्या संबधित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, आमदारांच्या आपत्रते विषयी निर्णय घेण्याचे अधिकार विधान सभा अध्यक्ष यांना सुपूर्द केले आहेत. या विषयी विधानसभा अध्यक्ष यांनी नुकतीच शासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावून चर्चा केल्याचे वृत्त आहे. पणं बैठकी नंतर पत्रकार परिषद घेऊन या विषयी मत व्यक्त केले, हे कितपत योग्य आहे. सर्वोच्च न्यायालयानेही निकाल देणे टाळलेला हा अतिशय ज्वलंत आणि गंभीर विषय, त्यावर घटना समितीवरील अधिकारीच दैंनदिन टिका टिप्पणी करत राहणे योग्य नाही. या टिप्पणीवर संबधित विरुद्ध पक्ष प्रतिक्रिया देणारच, त्यावर स्पष्टीकरण असे वाग्युद्ध सुरू राहते. या करिता विधिमंडळ अध्यक्षांनी कमीतकमी पदाचे औचित्य राखून या केसच्या निकालापर्यंत पत्रकार परिषद टाळावी, जेणेकरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत विधान सभा अध्यक्ष पद तरी दूर राहून संविधानाचा सन्मान कायम राहील.
विजयकुमार वाणी, पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा