रविवार दिनांक २१ मे २०२३ लोकरंग - हाय कमांडीकरण आणि कलते कमंडल !
भाजपच्या २०१४ पासून मे २०२३ कर्नाटक विधानसभा पर्यंतचा घेतलेला लेखाजोगा अतिशय स्पष्ट आहे. संपूर्ण भारतवर्ष फक्त भाजपचेच आहे, ह्या भ्रमाच्या भोपळ्यातून लेखात म्हंटल्याप्रमाणे मित्राचे वडिलांचं काय, सारेच बाहेर आले असतील. लेखात, प्रत्येक राज्यनिहाल निकाल, प्रत्येक राज्याची परिस्थिती, मतांची टक्केवारी, असंगाशी हात मिळविणी , हे दर्शवून केंद्रीय सत्ताधारी कोणत्या केविलवाणी परिस्थितीत आहे हे दाखवून दिले आहे. कर्नाटकाच्या निकालाचा, विविध अंगांनी घेतलेला परामर्श आणि काँग्रेसच्या विजयापुढे सत्ताधाऱ्यांची तयारी काजव्यागत दिसून आली. आजच्याच चांदणी चौकातून "खरगे आणि सूरजेवाला " सदरात यांनी घेतलेली वर्षभर मेहनत जिंकण्याची जिगर वृत्ती दर्शविते तर सत्ताधारी मुख्यमंत्री पदाच्या दावेदारास तिकीट सुद्धा देऊ इच्छित नव्हते, दिल्ली पंजाब हिमाचल पराभवाने काहीच शिकले नाहीत असे दिसून आले. महाराष्ट्रातील सत्तापालट तर सर्वोच्च न्यायालयाने लाजिरवाणा ठरविला. या पराभवांची मीमांसा न करता, केंद्रीय अध्यक्ष मुंबई महापालिका जिंकण्याचे मनसुबे दाखवितात. खरे तर या अध्यक्षांनी स्वतः पदा वरून दूर व्हायला हवे,असो. खरे तर असे लेख सामान्यजन मन लावून वाचतात, पणं ज्यांच्या विषयी समुपदेशन आहे त्यांनी सुद्धा वाचावेत, आपल्या चुका दुरुस्त कराव्यात, जेणेकरून भविष्यातील यशाचा मार्ग सोपा राहील, नाहीतर मी, हम, आम्ही, आमच्याकडे भारतवर्षाच स्वामित्व म्हणत यापुढील निवडणुकीत घात होत राहील आणि हायकमांडच्या कमलंडूतून पाणी नाहीसे होण्याची शक्यता फार दूर नाही.
विजयकुमार वाणी, पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा