बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

लेख (१५२) ६ डिसेंबर २०२३

 



राष्ट्रीय गुन्हा नोंद - गुन्हे आणि आत्महत्यांचे भयावह चित्र 


राष्ट्रीय गुन्हा नोंद विभागातर्फे करण्यात आलेल्या गुन्हेगारीचे विश्लेषणात राज्यात प्रत्येक तासाला ७ गुन्हे घडतात, त्यात महिला आणि बालकांवरील अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे . विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या याचे भयावह प्रमाण, वाहतूक अपघात,  ३० ते ४० वयोगटातील अल्प उत्पन्न, कौटुंबिक समस्या, आजाराने ग्रस्त होणाऱ्या आत्महत्या,  आदी सारे चित्र अतिशय चिंताजनक वाटते.   शिक्षण ,कृषी ,आरोग्य, रुग्णालये , स्वच्छता, अंतर्गत सुरक्षा , कायदा व सुव्यवस्था आदी मूलभूत कार्ये राज्य शासनाच्या अखत्यारीत येतात . परंतु असे अहवाल प्राप्त झाल्यावर शासनाने त्वरित दखल घेणे गरजेचे आहे .  गुन्हेगारी रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्तीचे पालन अवलंबून कडक धोरण राबवावे लागेल.  मनोविकार तज्ञांच्या सल्ल्याने  सार्वजनिकरित्या,  विविध माध्यमांद्वारे नागरिकांचे मनोधैर्य वाढविणे, बेरोजगारांना आर्थिक सहाय्य योजनांद्वारे उद्योग धंदा करण्यास प्रोत्सहीत करणे , शेतकऱ्यांचे प्रश्न बारकाईने शोधून मार्ग दाखविणे, इत्यादी मार्गांचा अवलंब करून मोठ्या प्रमाणावर होणारे गुन्हे, हत्या,आत्महत्या रोखता येऊन प्रमाण होण्यास मदत होईल .  शासनाने या अहवालाचा गांभीर्याने विचार करावा . 

विजयकुमार वाणी , पनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: