बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

लेख (१५४) ७ डिसेंबर २०२३


आर्थिक शिस्तीसाठी  - एक वर्षे सारी कर्जे वितरण थांबवावे . 


लोकसत्ता दिनांक ७ डिसेंबर २०२३ अंकातील "नवे बँक बुडवे कोण ? संपादकीय वाचले .बँकांचे मुख्य काम ठेवी स्वीकारून, ठेवींचीच आलेली रक्कम जास्त दार व्याजाने कर्जेरुपी वितरित करून, ठेवींवर व्याज दिले जाते .  सामान्यतः चोख व्यव्यहार असणाऱ्या बँकात हे चक्र सुरळीत सुरु राहते .  परंतु काही उच्चपदस्थ बँक अधिकारी, संधीसाधू राजकारणी यांच्या साथीने व्यवहारात काळेबेरे करून धनाढ्य होणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठमोठाली कर्जे उपलब्ध करून कमिशन प्राप्त करून बँकांना खिंडार पाडण्याची  कामे वर्षानुवर्षे होत आहेत .  प्रशासनाचा , कायद्याचा, न्यायालयाचा धाक नसल्यामुळे आणि राजकीय वरदहस्तांमुळे कर्जे बुडविण्याची परंपरा शतकानुशतके कायम सुरु आहे .  उद्योगधंद्यांना लागणाऱ्या भांडवलासाठी सहज कर्ज उपलब्ध  होते . या उलट सामान्यांना घर अथवा वाहन घेणे तेही डिपॉजिट्स,  गॅरंटी , मॉर्टगेज आदी साऱ्या कटकटीतून बँकेतून कर्ज मिळते.  एखादा हप्ता चुकला तर एसएमएस , कॉल पासून ते रजिस्टर पत्रापर्यंत सारेच व्यवहार होतात आणि  पुढच्या हफ्त्यात रक्कम वाढवून कापली जाते .  हि बँकेची भिती सर्वसामान्यांना कायम आहे .   व्यापारी कर्जदाराने दिवाळखोरी घोषित केल्यास ,  कर्जाची वसुली थांबते .  कर्जदाराने दिलेल्या तारणाचे मूल्य कर्जाच्या रकमेपेक्षा कमी झाल्यानेही कर्ज राईट ऑफ केले  असे बँक जाहीर करते .  तेव्हा बुडीत कर्ज दाखवून कर्ज राईट ऑफ करून, कर्ज तोट्याच्या पुस्तकात टाकून, ज्यातून बँकेला अधिक परतावा मिळण्याची शक्यता नाही आणि जे अनुत्पादित मालमत्ता [एन पी ए ] च्या श्रेणीत जाते.  राईट ऑफ केल्याने थकबाकी वसूल करण्याचा बँकेला अधिकार कमी होतो, शिवाय बॅड डेट राईट ऑफ हा बँकेचा नफा समजला जातो .  बँका सर्व सामान्यांची कर्जे राईट ऑफ करीत नाहीत , हे साऱ्या सरकारांना , बँकांना , माध्यमांना , सर्व सामान्यांना हे कळते आहे पण  त्याचा फरक कुणासही पडत नाही .  नुकतेच मध्यवर्ती रिझर्व्ह बँकेने बँका , वित्त संस्था मार्फत दिल्या जाणाऱ्या व्यक्तिगत कर्जाच्या प्रमाणात झालेली वाढीबाबत चिंता व्यक्त केली , परंतु रिझर्व्ह बँकेने मोठमोठाली कर्जे वितरणासाठी , वसुलीसाठी मार्गदर्शक तत्वे . खबरदारीचे उपाय योजले नसावेत अन्यथा , कर्जे बुडविण्याची सहसा हिंमत झाली नसती .  याच बँकांच्या गोंधळ भोंगळ  कारभारामुळे स्व सुब्रतो रॉय सहारा यांचे सेबीच्या खात्यात असलेल्या २५ हजार कोटींचे काय करावे याचेही नियमन नाही .  सारे व्यवहार सुरळीत होण्यासाठी , ठेवी , कर्जे याचा ताळमेळ बसण्यासाठी एका आर्थिक वर्षासाठी कर्जे वितरण थांबवावे.  त्या पूर्ण वर्षात आधी वितरित केलेल्या कर्जाची फक्त वसुलीचे नियमन करावे, स्थावर जप्ती , मालमत्ता विक्री, आदी सोपस्कार या वेळेत पूर्ण करावेत.  आर्थिक शिस्त लागण्यासाठी कठोर उपाययोजना गरजेचे आहे . 

विजयकुमार वाणी , पनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: