बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

लेख (१५३) ६ डिसेंबर २०२३


उबाठा यांची बॅलट पेपर - हास्यास्पद मागणी 


मंगळवारच्या पत्रकार परिषदेत सेना उबाठा गटाचे श्री उद्धवजी यांनी "दम असेल तर बॅलट पेपरवर निवडणुका घ्या"  असा सज्जड इशारा  मा  पंतप्रधान श्री मोदी यांना दिला . इतिहास जमा झालेली बॅलट पेपर निवडणूक आधुनिक काळातील इव्हिम मशीन पर्यंत पोहोचली आहे. परंतु मनात शंका काळेबेरे घेऊन, पूर्वी देशातील बऱ्याच राज्यात बदनाम झालेल्या बॅलट पेपर ची मागणी राज्याचेच माजी मुख्यमंत्री करीत आहेत हे हास्यास्पद वाटते .   राज्याच्या प्रमुखपदी असताना त्यांच्या काळात एकही निवडणूक झालेली नसल्याने त्यांना निवडणुकीच्या कामाचा पसारा आणि महत्व कळले नाही असेच म्हणावे लागेल .  पराजयात बॅलट पेपर
आणि विजयात मोदींची जादू ओसरली किंवा मतदारांनी अव्हेरले असे म्हणत कुठपर्यंत चालायचे हे ठरवावे . उलट "नकारात्मक  भूमिका सोडून दिली तर लोकांचा विरोधकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकेल" , हा पंतप्रधानांचा  वडिलकीचा सल्ला गोड मानून घ्या . 

विजयकुमार वाणी , पनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: