गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

लेख (१५७) २० डिसेंबर २०२३



संसदेतील विरोधकांनी निलंबनाचा काळ २०२४ च्या रणनीतीसाठी वापरावा .  


दिनांक १४ डिसेंबर २०२३ लोकसत्ता अंकातील "सबै संसद सत्ता की " संपादकीय वाचले. संसदेतील सुरक्षा भेदण्याच्या कृतीवरून दोन्ही सभागृहांत घातलेल्या गोंधळानंतर विरोधी पक्ष खासदारांचे घाऊक निलंबन करण्यात आले, या घटनेवरून उर्वरित सदस्यांनीही राजीनामे द्यावेत, असे इंडिया आघाडीला वाटते .  तिन्हीही राज्यातील पराजयानंतर, हताश झालेल्या काँग्रेससह विरोधी आघाडीत अनेक चेहरे असले तरी,  २०२४ सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभावी मोहीम राबविण्यासाठी  कोणतीही कल्पना नाही.  खरेतर काँग्रेसच्या पराजयाने, क्षीणतेमुळे बऱ्याच राज्यातील जागावाटपाची प्रक्रिया गतीने होऊ शकते .  तेलंगणातील विजयाने, काँग्रेस आंध्र प्रदेशातील विजयाचे स्वप्न पाहू  लागली.  केरळ , तामिळनाडू, ओरिसा , पश्चिम बंगाल  मध्ये स्थानिक पक्षांची सरकारे कार्यरत आहेत .   मराठा आंदोलन आणि शेतकऱ्यांचे असंतोषाला भाजप बऱ्या पैकी  गोत्यात आला आहे तरीही महाराष्ट्रात काँग्रेसला, पवार, ठाकरेंचा पाठिंबा  मिळण्याची शक्यता नाही.  उत्तरेतील पट्टा सोडल्यास , बिहार मध्ये जातीय आधारित जनगणना करून इंडियाच्या एका पक्षाने आघाडी घेतली आहे .  परंतु सत्ताधारी बीजेपीच्या प्रचारातील, भारताची  जागतिक  प्रतिमा , कल्याणकारी योजना , काश्मीर , राम मंदिर , या  प्रमुख मुद्द्यांपुढे इंडिया आघाडीच्या प्रचाराचे मुद्दे आजच्या घडीला तरी गौण ठरत आहेत .  तिन्हीही राज्यातील निवडणुकांत,  वाढती महागाई , बेरोजगारी या मुद्द्यांवर इंडिया आघाडी सपशेल अपयशी ठरली तर एक्सिट पोलच्या तर चिंधड्या उडाल्या.  उच्चभ्रू आणि सामान्य जनांना आकर्षित करणारे बीजेपी पेक्षा चांगले आर्थिक व्यवस्थापन, चांगल्या आर्थिक योजना यांची काँग्रेस इंडिया आघाडीकडे नक्कीच वानवा आहे .  परिणामी  लोकप्रिय , निर्णायक नेतृत्व या जमेच्या आधारावर बीजेपीचा हिंदी पट्ट्यातील विजय आणि ३५० च्या वर संसद सदस्यांचा आग्रह नक्कीच सकारात्मक आहे .  सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा शेवटचा निर्णायक कालखंड आहे , परंतु मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेतील इंडिया आघाडी , संसदेत गदारोळ , थट्टा मस्करीत वेळ काढू धोरणात निर्नायकी अवस्थेतच निवडणुकांना सामोरे जाईल असे वाटते .  दैव बलवत्तर असेल तरच इंडिया आघाडीचा सामना होऊ शकतो अन्यथा पायलीचे शंभर दिडशे निवडून येत २०२९ ची वाट पहात बसावे लागेल . 


विजयकुमार वाणी , पनवेल  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: