नवीन वर्ष नवीन आशा !!
दिनांक १ जानेवारी २०२४ म .टा. अंकातील " आशेची नवी ज्योत " संपादकीय वाचले. एकंदरीत सकारात्मक स्थितीचे अवलोकन प्रस्तुत लेखात आहे . २०२३ चा कालखंड पाहता, देशाची आर्थिक स्थिती भक्कम होताना दिसत आहे. गेल्या सहा महिन्यात बीए ई निर्देशांकाने अठरा टक्क्यांनी वाढ दर्शवत पुढे तेजी कायम ठेवण्याची शक्यता आहे. गुंतवणुकदारांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असून, मुंबईच्या पुढे उत्तर प्रदेशच्या गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे , हे आर्थिक साक्षरतेचे प्रमाण मानले जावे. केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात पायाभूत सुविधांचा विस्तार केल्यामुळे, अर्थव्यवस्था आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली आहे. वित्तीय तुटीचा दर कमी त्यामुळे दहा वर्षात महागाईचा दर साडेचार टक्के ते सात टक्के राहिला. परदेशी गुंतवणुकीत मोठी वाढ झाली. पण आर्थिक प्रगती साधताना , काही त्रुटीही समोर येत आहेत . बेरोजगारीचे प्रमाण लोकसंख्येच्या मानाने सर्वोच्च आहे . दरडोई उत्पन्नाबाबत सर्वात तळाला, भूक निर्देशकात शंभराच्या वरच्या स्थानावर आहे . या बाबींचाही सखोल विचार होणे आवश्यक आहे . केंद्र सरकारने सामान्यांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी ठळक योजना , बेरोजगारांना रोजगार उपलब्धी , या दोन सेवांकडे लक्ष दिले तरी पंचवीस टक्के बेरोजगारी , दरडोई उत्पन्नात वाढ ,, भूक निर्देशकांत सुधारणा होऊ शकतो . नवीन वर्ष नवीन आशा घेईलच, अशी आशा व्यक्त करूया .
विजयकुमार वाणी , पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा