(१)
आर्थिक उन्नतीत शेतीही महत्वाचा घटक . . . .
दिनांक ८ जानेवारी २०२४ म .टा. अंकातील " अर्थ आणि परमार्थ " संपादकीयात कृषी क्षेत्राची अल्पशी वाढ हे चिंताजनक आहे . कृषी क्षेत्र, देशाच्या महसूल वाढीत उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे, परंतु कमी पर्जन्यमान, हवामान बदल इतर घटकांचा एकत्रित परिणामी होऊन, कृषी उत्पादन घसरत चालले आहे . उत्पादनांची कमतरता झाल्यास, शेत मालाला वाढीव भाव मिळतो आणि शेतकरी तेच उत्पादन घेतो. परंतु पुरवठा जास्त आणि मागणी कमी झाल्यामुळे, शेतमालाची नासाडी होउन, शेतकरी पुन्हा शून्यावर येतो . त्यात केंद्र / राज्य सरकारांच्या उत्पादन क्षेत्र संबधी निर्यात धोरणही शेतकऱ्यांना त्रासदायक ठरते . म्हणून केंद्राने , राज्याने शेती विषयक धोरणांची, कृषी पायाभूत सुविधा योग्य प्रकारे विकसित करून , अंमलबजावणी केल्यास छोटा शेतकरी ते जमीनदार, मान्सून, हवामान बदला व्यतिरिक्त वर्षभराच्या पिकांतून उत्पन्न मिळवून देशाच्या उन्नतीस नक्कीच हातभार लावत उद्देश हाच की , पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या आणि पुढच्या क्रमांकावर जात असताना, कृषी घटकाचा विसर न व्हावा .
विजयकुमार वाणी , पनवेल
(२)
आहे ते सांभाळण्याचा विरोधकांचा कल . . .
चेअरमन, लोकमत समूह यांचा " यात्रेआधीच इंडियात धुसपूस " विषयातील न्याय यात्रा, काँग्रेस आणि इंडियातल घटक पक्ष यांच्यातील ताळमेळ बिघडत चालला आहे या संबधी विचार मांडलेत ते वाचलेत . विरोधकांचे एकत्र न येणे याच्या प्रमुख कारणांपैकी प्रत्येक नेत्याची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा,
ईडी आदींच्या रडारवर येण्याची भीती, आपसातील फाटाफूट यामुळे, जिंकून येण्यापेक्षा आहे ते सांभाळण्याचा विरोधकांचा कल एव्हाना स्पष्ट झाला आहे . गेल्या पाच वर्षातील सर्वच निवडणुकीचा सारासार विचार केला तर , दोन तीन राज्ये सोडल्यास, सत्ताधारी पक्षास ठळक यश मिळालेले आहे . नऊ वर्षांची केंद्रातील सत्ता , निवडून आलेले एकूण सहस्त्रावधी सांसद , विधायक, नगरसेवक यांची आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांची फौज एवढे प्राबल्य पाहूनच इंडिया आघाडीला
धडकी न भरे तर नवलच . अशा दिसून येणाऱ्या कारणाने इंडिया आघाडी कितपत तग धरेल यात खरोखर शंका आहेच , त्यात आगली बार चारसो पार घोषणेने आणखी गोंधळ वाढविला आहे. पाहूया काय निकालात निघते ते ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा