दिनांक १७ मार्च २०२३ महाराष्ट्र टाइम्स "अवकाळीचे तप्त अश्रू" संपादकीय वास्तविक परिस्थितीची जाणीव करून देणारे आहे. राज्यात वातावरणातील बदल, वेळी अवेळी पडणारा पाऊस, उष्णतामान, जमिनी, पीक पद्धती, या साऱ्यामुळे आणि अनिश्चित पीक उत्पादनामुळे, शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. शासनाने दिर्घ कालीन योजना आखून कठीण परिस्थितीतून बळीराजाला बाहेर काढणे गरजेचे आहे. बळीराजाच्या कायम स्वरुपी उत्पन्नासाठी, त्या, त्या भागातील गरजेनुसार योजना आखणे जरुरीचे आहे. खरीप पिकांचे नियोजन, रब्बी हंगामाचे नियोजन, उन्हाळी पिक वाढीच्या महत्वाच्या अवस्था, गरजेनुसार पिकांचे पाणी व्यवस्थापन, सिंचन पद्धतीचा अवलंब, विहीर पुनर्भरण, यासह अनेक योजनांची अंमबजावणी होणे महत्वाचे आहे. ग्रामपंचायतासाठी किंवा १०० हेक्टर परिसरासाठी, कृषी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, त्यांच्या साहाय्यासाठी पदवीधर बेरोजगार तरुणांना माहिती संकलनासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत सामावून घ्यावे. त्यांच्या अभ्यासानुसार पीक लागवड, उत्पादन ते विक्री यासाठी साखळी बनवून प्रत्येकास आवश्यक पीक उत्पादनावर लक्ष्य देणे शक्य होईल जेणेकरून बळीराजा या संकटातून बाहेर येईल.
विजय आप्पा वाणी, पनवेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा