शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४
लेख (१६६) १८ जानेवारी २०२४
बुधवार, १७ जानेवारी, २०२४
लेख (१६५) १६ जानेवारी २०२४
(१)
मराठीची गळचेपी कायमचीच !!
शनिवार, १३ जानेवारी, २०२४
लेख (१६४) १३ जानेवारी २०२४
(१)
सोमवार, ८ जानेवारी, २०२४
लेख (१६३) ८ जानेवारी २०२४
(१)
चेअरमन, लोकमत समूह यांचा " यात्रेआधीच इंडियात धुसपूस " विषयातील न्याय यात्रा, काँग्रेस आणि इंडियातल घटक पक्ष यांच्यातील ताळमेळ बिघडत चालला आहे या संबधी विचार मांडलेत ते वाचलेत . विरोधकांचे एकत्र न येणे याच्या प्रमुख कारणांपैकी प्रत्येक नेत्याची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा,
रविवार, ७ जानेवारी, २०२४
लेख (१६२) ६ जानेवारी २०२४
गुरुवार, ४ जानेवारी, २०२४
लेख (१६१) ५ जानेवारी २०२४
बाबू काय, प्रतिनिधी काय सामान्यांना दोन्हींकडून बुक्क्यांचा मार !!दिनांक ४ जानेवारी २०२४ लोकसत्ता अंकातील " बाबू काल" संपादकीयात, राज्यातील प्रशासकीय कारभारामुळे लोकशाही व्यवस्थेची, धोरणांची होत असलेली पायम्मली निदर्शनास आणली आहे. राज्यातील एकूण २९ महापालिका, २२६ नगरपालिका क्षेत्रात आजच्या घडीला प्रशासकीय यंत्रणा राबविली जात आहे. यास केवळ सामान्यजन, नागरीक सर्वार्थाने जबाबदार आहेतच, पण त्याहून अधिक, निवडून आलेले पंचायत, पालिका, विधायक, सासंद त्या पेक्षाही जास्त जबाबदार आहेत. राज्यातील सर्वच महानगरांमध्ये लोकसंख्या वाढीच्या वेगात निवासी विभागाचा विस्तार होत गेला. तथाकथित लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादामुळे निम्म्याहून अधिक बेकायदेशीर अतिक्रमणे उभी राहिलीत. अनेकदा उच्च न्यायालयानेही याची दखल घेत, आजही कोरडे ओढत आहे. परिणामी शहरांचा बकालपणा वाढून पालिकेच्या नागरी सुविधा पुरविण्यात ताण पडू लागला. यामुळेच मुद्यात आणखी एक भर पडली ती मतदारसंघ पुनर्रचनेची. स्थानिक पुढाऱ्यांना वाढीव बेकायदेशीर विभाग, आपल्या मतदार संघात जोडण्यासाठी अहमिका लागली आणि जीवघेणी स्पर्धा होऊन परिणामी बऱ्याच पालिकांची पुनर्रचना आजही न्यायालयात प्रलंबित असल्यामुळेही निवणुकांना विलंब होत आहे हे सर्वश्रुत आहे.
लेखातील नगरसेवक काही कामाचे नाहीत, या मुद्यावरही मतमतांतरे असू शकतात. कारण पाच वर्षांसाठी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची कामागिरी तशी बऱ्याच बाबतीत असमाधानकारक असते. केवळ स्थानिक भागाचा विकास करताना संपूर्ण शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष होते हे यांच्या गावीही नसते. आज सर्वच शहरांची अवस्था,पालिकांकडील
अपुरे मनुष्यबळ, निधीची कमतरता, बाबूंचा कामचुकारपणा या कात्रीत सापडल्यामुळे पाणी, मलनिःसारण, वाहतूक कोंडी, प्रदूषण, अतिक्रमण, अस्वच्छता, आरोग्य , या सर्व व्यवस्था अव्यवस्था झालेल्या आहेत. यासाठी योग्य कारवाई करणाऱ्या कडक शिस्तीच्या आयुक्तांची, अधिकाऱ्यांची सहा महिन्यात उचलबांगडी करणाऱ्यात बाबूंचीच जास्त कारागिरी असते. त्यामुळे बाबू काय, प्रतिनिधी काय सामान्यांना दोन्हींकडून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. आता सामान्यांनीच उच्च /सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी हाच पर्याय उरलेला आहे, जेणेकरून निवडणुकांचे बिगुल वाजून प्रतिनिधींसोबत बाबूही कार्यमग्न होऊन लोकशाहीचे चांगभले होईल हिच काय आशा.
विजयकुमार वाणी, पनवेल
बुधवार, ३ जानेवारी, २०२४
३ जानेवारी २०२४
साहेब, मी विजय वाणी , (३ जाने २०१९) आजपासून आपला पी ए म्हणून काम करणार आहे. साहेबांनी पाहिलं, " बरं " म्हणाले आणि *वरिष्ठ आय ए एस अधिकारी श्री संजय सेठी साहेब (१९९२)* यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.
साहेबांची एडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग मधील केबिनचे रीन्युवेशन काम सुरू होते, ते पूर्ण होई पर्यंत साहेबांना रहेजा सेंटर येथील ऑफिस मध्ये काम करायचे होते आणि १६ जानेवारी रोजी प्रवेश करण्याचे योजिले. त्याच दिवशी साहेब, पहिल्या प्रहरात पोर्ट राऊंड करून एडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग मध्ये दुपारी प्रवेश करते झाले. *लोकमत " बेस्ट पर्सनोलीटी आय ए एस अवॉर्ड "* मिळविणाऱ्या साहेबांना पाहण्यासाठी संपूर्ण गर्दी झाली होती. साहेबांसोबत सौ सोनिया सेठी आय ए एस अधिकारी पणं होत्या. अशा प्रकारे कामकाजास सुरुवात झाली.
२६ जानेवारी गणतंत्र दिवस साजरी होणार होता आणि साहेबांनी मराठीत भाषण करायचे म्हणून निर्णय सांगितला. चेअरमन ऑफीसला येऊन १५ दिवसच झाले होते, पणं जे एन पी च्या ३३ वर्षांचा अनुभव गाठीशी असल्याने तीन पानांचे मराठीत भाषण लिहून दिले. कामाच्या व्यापात साहेबांनी ते पाहिले देखील नाही आणि ध्वजवंदन समयी, साहेबांनी भाषण मागितले, साहेबांनी ते तसेच वाचून दाखविले आणि माझ्यावरील विश्वास सार्थ ठरविला. यापुढील साहेबांच्या प्रत्येक कामात महत्वाचा सहभाग मिळू लागला. चुकांच्या वेळी साहेब रागवायचे पणं त्यांच्या रागवण्यात प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळायचे.
प्रत्येक पी ए चे एक स्वप्न असते, चेअरमन अर्थात आय ए एस अधिकाऱ्यांसोबत काम करायला मिळावे, ते स्वप्न पूर्ण झाले होते. साहेबांची दर सोमवारी दुपारी ३ वाजता होणारी एच ओ डी मीटिंग आणि वाणी, हे साहेबांसाठी समीकरणच होते. मीटिंगचे मिनिट्स केवळ औपचारिकता म्हणून पहात होते, एवढा विश्वास नक्कीच मिळविला होता. फेब्रुवारी २०२० मध्ये श्री उन्मेश वाघ साहेब, आय आर एस यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांच्याकडे काम करण्यास मी आग्रही होतो, साहेबांनी त्यांच्या कामातही लक्ष द्यावे लागेल, या अटीवरच पणं नाखुशीनेच परवानगी दिली. पुढे कोरोना काळ , पोर्ट खाजगीकरण, वाढवणं पोर्ट, एस ई झेड, पार्किंग प्लाझा, या प्रकल्पांच्या प्रचंड कामात साहेबांनी नियोजनपूर्वक काम करून पूर्णत्वास नेले. केवळ प्रकृतीची जपणूक (व्हि आर एस चा मोह ?) कारणामुळे सेवानिवृत्ती स्वीकारली आणि अत्यंत शिस्तबद्ध अधिकाऱ्यांच्या तालमीत मिळालेल्या गुणांना दुसऱ्या क्षेत्रात काम करण्यासाठी सिद्ध झालो. *साहेबांना अतिरिक्त सचिव पदाच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा*.
विजयकुमार वाणी
लेख (१६०) २ जानेवारी २०२४
नवीन वर्ष नवीन आशा !!
दिनांक १ जानेवारी २०२४ म .टा. अंकातील " आशेची नवी ज्योत " संपादकीय वाचले. एकंदरीत सकारात्मक स्थितीचे अवलोकन प्रस्तुत लेखात आहे . २०२३ चा कालखंड पाहता, देशाची आर्थिक स्थिती भक्कम होताना दिसत आहे. गेल्या सहा महिन्यात बीए ई निर्देशांकाने अठरा टक्क्यांनी वाढ दर्शवत पुढे तेजी कायम ठेवण्याची शक्यता आहे. गुंतवणुकदारांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असून, मुंबईच्या पुढे उत्तर प्रदेशच्या गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे , हे आर्थिक साक्षरतेचे प्रमाण मानले जावे. केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात पायाभूत सुविधांचा विस्तार केल्यामुळे, अर्थव्यवस्था आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली आहे. वित्तीय तुटीचा दर कमी त्यामुळे दहा वर्षात महागाईचा दर साडेचार टक्के ते सात टक्के राहिला. परदेशी गुंतवणुकीत मोठी वाढ झाली. पण आर्थिक प्रगती साधताना , काही त्रुटीही समोर येत आहेत . बेरोजगारीचे प्रमाण लोकसंख्येच्या मानाने सर्वोच्च आहे . दरडोई उत्पन्नाबाबत सर्वात तळाला, भूक निर्देशकात शंभराच्या वरच्या स्थानावर आहे . या बाबींचाही सखोल विचार होणे आवश्यक आहे . केंद्र सरकारने सामान्यांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी ठळक योजना , बेरोजगारांना रोजगार उपलब्धी , या दोन सेवांकडे लक्ष दिले तरी पंचवीस टक्के बेरोजगारी , दरडोई उत्पन्नात वाढ ,, भूक निर्देशकांत सुधारणा होऊ शकतो . नवीन वर्ष नवीन आशा घेईलच, अशी आशा व्यक्त करूया .

