गुरुवार, २२ जून, २०२३

लेख (९३) २३ जून २०२३



आरास कुणाचीही असोकुरघोडीचे मखर चीनचेच असणार !!

दिनांक २२ जून २०२३ लोकसत्ता संपादकीय वाचले. मा पंतप्रधानांच्या भेटीवर अमेरिकाभारत व्हाया चीनचे संबंध यावर भाष्य केले आहे. दुसया महायुद्धात जपानअमेरिकेसोबत चीनचाही शत्रू होता. मात्र तैवानकोरिया प्रकरणानंतर अमेरिकेचे चीनशी संबध बिघडले असताना देखीलअमेरिकेची  पिंग पोंग डिप्लोमसीकिसींजर आणि अध्यक्ष निक्सन यांच्या चीन भेटीत बरेच रहस्य दडलेली आहेत . चीनने साम्यवादी व्यवस्थेत १९७९ साली आर्थिक उदारीकरण सुरू केले. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संबंधातचीनला जगाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केले. १९८०च्या दशकात चीन जागतिक बँकआंतरराष्ट्रीय नाणेनिधीएशियन डेव्हलपमेंट बँक अशा आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सहभागी झाला.  २००१ साली चीनचा जागतिक व्यापार संघटनेत प्रवेश झाला. दोन्ही देशांतील व्यापार उच्चांकी पातळीवर गेला. २००८ सालापर्यंत चीन हा अमेरिकेतली कर्जे विकत घेणारा सर्वांत मोठा देश बनला होता. याच वर्षी अमेरिकेतली लेहमन ब्रदर्स ही बँक बुडाली आणि जागतिक मंदी आली आणि अमेरिकेचा चीन स्पर्धक झाला. अमेरिका-चीन व्यापारात अमेरिकेच्या बाजूने मोठी तूट होती. फायदा चीनला अधिक होत होता. त्याच काळात भारताने रशिया सोबत २० वर्षांचं मैत्री करार केलासोबत युरोपीयआखाती देशइराणयांच्यासोबत आयात निर्यातीचे धोरण अवलंबूनअमेरिकाचीन यांच्यानंतर पर्याय उभा केला.  भविष्यात अमेरिकेला बाजूला करून जागतिक महासत्ता बनण्याचे चीनचे मनसुबे जगजाहीर आहेत. व्यापार-युद्धापलीकडे जाऊन उघड वैर पत्करण्यास सुरुवात केली. म्हणून अमेरिकेला पुन्हा जपानऑस्ट्रेलियाभारतफिलिपीन्स आदी देशांची गरज भासू लागली. त्यातून ‘क्वाड’ या संकल्पनेचा उदय झाला. एकीकडे चीन आणि अमेरिका यांचे संबंध यापूर्वीही तणावपूर्ण पातळीला जाऊन पुन्हा सुधारले आहेत.  चीन तवांगडोकंलामगलवानसीमांवर घुसखोरी करून भारताशी वैर वाढवीत आहे. तरीही भारताने गेल्या तीन वर्षात चीन कडून ७ ते ८ अब्ज डॉलर्सच्या वर विक्रमी आयात केली आहेत्याबदल्यातील निर्यात नगण्यच ठरते. अमेरिकेत कमी मनुष्यबळ पण अर्थ व्यवस्था मजबूतभारताकडे प्रचंड मनुष्यबळ पण अर्थ व्यवस्थेच्या मानाने उत्पादन क्षमता कमीत्याच तुलनेत चीनकडे मनुष्यबळ आणि मजबूत अर्थ व्यवस्थेच्या जोरावरदैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तू निर्माण करून जगातील सर्वच बाजारपेठा काबीज केल्या आहेत.  अंतिमतः एकमेकांच्या गरजा यावरच देशो देशीचे परस्पर संबंध होत आहेत. पण चीनची गेल्या तीन दशकातील उत्पादन क्षमतेची एकाधिकारशाही एवढी सहजासहजी मोडणे सर्वानाच मुश्किल आहेम्हणूनच आरास कुणाचीही असोकुरघोडीचे मखर चीनचेच असणार हे निर्विवाद सत्य नाकारून चालणार नाही. 

 

 

विजयकुमार वाणी पनवेल  

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: