मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

लेख (७२) ०५ एप्रिल २०२३

 


त्यांची नाटो तर आपली वाटो 

दिनांक ५ एप्रिल २०२३ लोकसत्ताचे "नाटो नाटो " संपादकीय वाचले. ४ एप्रिल रोजीच नाटोस ७४ वर्षे पूर्ण झालीत आणि फिनलँड ३१ वा देश सहभागी झाला. पाश्चिमात्य देशांचा इतिहास पाहता वर्णभेद आणि पौर्वात्य देशांचा दुस्वास हा कळीचा मुद्दा ठरतो . कारण जर्मनी, सोव्हिएट युनियन विरोधात स्थापन झालेली संघटना, पाच वर्षातच जर्मनीस सदस्य करून, पौर्वात्य देशांना वेगळे पाडण्याचा घाट असू शकतो . आजही सर्वच आंतरराष्ट्रीय संघटनांवर (डब्ल्यूटीओ ,जी ७, आयएमएफ, डब्ल्यूएचओ, न्यायालय वै) यांचेच वर्चस्व अबाधित आहे . अमेरिका कितीही म्हटलं तरी वसाहतवादी देश असून, या वसाहती युरोपातीलच आहेत. चलाखी आणि बुद्धी चातुर्याने एक सामूहिक सुरक्षा प्रणाली तयार करून एकत्रित लष्करी खर्च केला जावून , बाह्य पक्षाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षमता दाखविली आहे. याच चातुर्याने या देशांनी खनिज तेल देशांवर वर्चस्व ठेवून जागतिकीकरणात अग्रभागी आहेत . हेच नेमके पौर्वात्य देशांना जमलेले दिसत नाही. ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर ,कोरिया ,भारत, चीन ते रशिया देश, स्वतःस सार्वभोमत्व मानून शेजारील राष्ट्रांत कुरापती काढत बसतात, त्यामुळे पूर्वेतही एकटे पडतात आणि पश्चिमी बलाढ्य राष्ट्रांपुढे टिकाव धरू शकत नाही . त्यातल्या त्यात नॉन अलाइन कॉन्फरेन्स , जी ७, जी २०, क्वाड , सार्क अनेक प्रयोग करून भारत प्रगतीच्या वाटा शोधीत आहे , परंतु अजूनही म्हणावे तसे यश मिळत नाही . मुद्दा हाच की , पाश्चिमात्य देशांचे वर्षानुवर्षे असलेले वर्चस्व मोडीत काढून पूर्वेकडील आघाडी बनविणे कठिण तर आहेच पण पूर्वेच्या खोडी काढणाऱ्या शत्रू विरोधात तरी कमीत कमी वेस्टर्न आशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन (वाटो ) स्थापन करून, शक्यही आहे . 

विजयकुमार आप्पा वाणी , पनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: