रविवार, १६ एप्रिल, २०२३

लेख (७३) १७ एप्रिल २०२३

 


सत्ताधा-यांच्या चुकीच्या धोरणांचा विचार करणे आवश्यक ।

गेल्या पंधरा दिवसांचा लोकसत्ता वाचनाचा सहजच आढावा घेतला. लोकसत्तातील संपादकीय, स्तंभलेख, वृत्त बऱ्याचदा सत्ताधा-यांच्या  घडलेल्या चुका दर्शविणे सोबत दिशा देणारे सुद्धा असते . बरेचसे स्तंभलेख, वृत्त विरोधकांना बळ  मिळविण्यासाठी, जागृत करण्यासाठी असतात हे जाणवते .  उदाहरण द्यायचे असल्यास  न्यायालयांचे एन्काऊंटर , सुरुवात आणि सातत्य , आनंदामागील अर्थ, फेक की नेक ?, पवारांची  अदानी अदा,  विश्रांतीमागील वास्तव , नामांतरानंतर , दूरचे दिवे हे सारे संपादकीय, सत्ताधारकांचे कान टोचणारे,  चुकीचे निर्णय, धोरण आणि एकाधिकारशाहीचे द्योतक असल्याचे दर्शविते.  त्या सोबतच तज्ञ लेखकांचे स्तंभलेख जसे आता विरोधी पक्ष काय करणार ?,  सरकारच न्यायाधीश , लोकशाही विरोध लोकांना कसा खपेल ? भाजपविरोधी मोर्चे बांधणीला वेग , विकासदर सहा टक्क्यांखाली , स्थानिक यशाची काँग्रेसला गरज , विरोधी बिगुल निर्धाराने वाजवावा , २०२४ नाही, तर नंतरही नाही. , कर्नाटक जिंकेल तो राजकारण भेदेल,  हे सारे विरोधकांचे मनोधैर्य वाढवणारे वाटतात .  तसेच ध्रुवीकरणाच्या भूमीतून , डिजिटल इंडिया मागील दूरदृष्टी  हे अभ्यासू लेख या पसाऱ्यात वाचावयास मिळतात .  परंतु या आढाव्यात एकंदरीत देशाचे , सत्ताधा-यांचे असे नकारात्मक चित्र निर्माण होते.  म्हणजे या सरकारने गेल्या आठ नऊ वर्षात जे केले आहे ते सारे चुकीचेच आहे का? असे साहजिकच वाटू लागते.  एवढी नकारात्मकता यातून दिसून येते .  यासाठी या सरकारचे गेल्या आठ नऊ वर्षातील घेतलेले मोठे सर्व  निर्णय आणि त्याचे परिणाम याचे विश्लेषण होणे आवश्यक आहे , जेणेकरून सामान्यांना , विरोधकांना सत्ताधा-यांच्या चुकीच्या धोरणांचा विचार करता येऊन पुढची संधी द्यावी की न द्यावी याचा विचार करता येईल. 

विजयकुमार आप्पा वाणी , पनवेल  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: