परिवर्तन का तीन दशके सत्ता टिकविणे
आजच्या ४ नोव्हेंबर सकाळ आवृत्तीत दांडिया आणि भांगडा अग्रलेख वाचला. १९९५ ते आजतागायत गुजरात राज्यात एकच पक्षाची सत्ता आहे आणि आजही सदर पक्ष या निवडणुकीसाठी सुद्धा वरचढ दाखविण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील नेते सत्तेत केंद्रात प्रमुख असले तरीही या मातब्बर पक्षास गुजरात राज्याची निवडणूक सहजासहजी सोप्पी राहिली नाही.
पारंपरिक विरोधी पक्ष काँग्रेस कडे नेतृत्वाचा अभाव दिसत असला तरी भारत जोडो यात्रा आणि श्री खरगे यांची पक्षाध्यक्षापदी झालेली निवड यामुळे नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसच्या प्रचाराच्या आघाडीत श्री खरगे, श्री राहुल गांधी यांनी जोमाने प्रचार केला तर काँग्रेसकडे गेल्या निवडणुकीत मिळविलेल्या जागात नक्कीच भर पडेल. दुसरा प्रबळ दावेदार आप पक्ष श्री केजरीवाल यांच्या प्रयत्नाने निवडणूक घोषणे पूर्वीपासून गुजरात राज्यात क्रियाशील आहे. पद्धतशीर पणें प्रचाराचे
नियोजन, गोबेल्स निती वापरून सारखे सारखे नवीन विषय घोषित करून मतदारांपुढे येण्याचे धारिष्ट्य , मुख्यमंत्री पदाचे नाव घोषित करून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. आप ने ही सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न निर्माण करून प्रमुख विरोधी पक्ष होण्याइतके प्रबळ दावेदार होतील निर्विवाद सत्य आहे.
यात महत्वाचा मुद्दा आहे परिवर्तन, १९९५ पासून तब्बल २७ वर्षे एकाच पक्षाची सत्ता उलथवून टाकण्याचे तंत्र श्री केजरीवाल यांना उमगले आहे. गुजराती भाषेतून सवांद, मोफत वीज, मोफत शाळा आणि सत्ता मिळविणे हेच लक्ष मानून, दोन्ही विरोधकांवर सौम्य शब्दात टिका, त्यामुळे विरोधकांना यांना शिंगावर घेण्यास मुद्देच उरत नाहीत. यामुळे श्री केजरीवाल, साऱ्यांच्या पसंतीस उतरतील हे नक्कीच.
पारंरिक सत्तेला कौल का परिवर्तन ते ही दोन राज्यातील सत्ताधीशांना (आप आणि काँग्रेस) यांना संधी, हे चित्र येत्या महिना अखेरीस नक्कीच स्पष्ट होईल. पण निवडणूक घोषित झाल्यापासून सत्ताधाऱ्यांना घाम फुटला आहे हे नक्कीच.
विजय आप्पा वाणी, पनवेल, (हल्ली मुक्काम फ्रँकफर्ट )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा