गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

लेख १९

 इथे मराठीयांचे सरदार कोलमडले 

सकाळ बिट्वीन द लाइन्स विपरीत बुद्धी - श्री प्रफुल्ल फडके यांचा अतिशय सविस्तर आणि धक्कादायक माहिती देणारा लेख वाचला. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळानंतरही काँग्रेसजनांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची कायम उपेक्षा आणि अवहेलना केली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अगणित वीरांनी आपापल्या परीने कष्ट घेतलेत, वीरमरण पत्करले. पण काँग्रेसच्या लेखी काँग्रेसच्याच समूहात, जथ्यात , अधिपत्यात राहणाऱ्या , विचारांशी बांधिलकी असणाऱ्यांना मान सन्मान दिला. स्वातंत्र्य मिळाल्यावर पाठ्यपुस्तके द्वारा, प्रसिद्धी माध्यमांद्वारे त्याचा पुनरुच्चार केला. पण स्वा. सावरकरांच्या विषयी ओकली जाणारी गरळ मळमळ या काळातच का येत आहे, त्याचे समर्पक मत, लेखकाने मांडले आहे, पटते आहे. आपण साऱ्यांनी एकलेले वाचलेले अनुभवलेले स्वातंत्र्यवीर आणि अशी गरळ ओकणारी विषवल्ली ऐकली का तळपायाची आग मस्तकात जाते. त्यात सांसद, विधायक, प्रदेशाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष राहिलेले आणि महाराष्ट्राचेच नाना? पटोले यास दुजोरा देतात, कुठे गहाण ठेवली आहे यांनी स्वतःची आत्मियता स्वाभिमान, त्यांची री ओढणारे , अशा वेळेस गप्प राहणारे राज्याचे सर्व सर्वा जाणते राजे आणि त्यांचे सरदार, कुठे ठेवली यांनी राज्याची अस्मिता आणि कायम टोमणे मारणारे मराठीयांची मक्तेदारी घेतलेले यांचे वारसदार गळा भेट घेऊन कमरेत वाकतायेत , जोडो का फोडो यात्रा करतायेत, या अंजन घालणाऱ्या बिट्वीन द लाइन्स लेखाचे त्यांनी पुन्हा पुन्हा वाचन करावे आणि त्यांना भारतरत्न मिळवून द्या आणि आम्हालाही द्या अशा, स्वा सावरकरांच्या सदना शेजारीच आपण दसरा मेेळावे घ्यावेत, कितपत मनाला पटते.

विजय आप्पा वाणी, पनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: