गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२

लेख १५ (लोकसत्ता- विचार स्तंभ)

दिनांक २ नोव्हेंबर आजचा विचार मधील "सर्वस्व गमावले आता विचार स्व चा" स्विसएड या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जून ते सप्टेंबर या महिन्यातील कोविड मूळे पतींचे निधन झालेल्या स्त्रियांच्या सद्य परिस्थितीचा अभ्यास सादर केला आहे. ह्या गंभीर आणि अतिशय नाजूक विषयाचा विचार करणे, त्यासंबंधी सर्वेक्षण करून माहिती जमा करणे आणि मिळविलेल्या माहिती आधारे प्रत्येक घटकाचा अनेक मुल्यांकांवर अभ्यास करून विचार सादर करणे असे प्रचंड मेहनत असलेले वंदन करण्या सारखे कार्य यांनी केले आहे.  

खरे म्हणजे कोणतीही आपत्ती, घटना एखाद्या गावात, जिल्ह्यात, राज्यात घडली असता संबधित शासन यंत्रणेद्वारे अशा घटना पुन्हा घडू नये किंवा घडल्यास त्याचे कमीतकमी परिणाम व्हावेत त्या संबंधी उपाय योजना कराव्यात. त्यातही या घटना घडल्यानंतर , आपत्ती धारकांचे निवारण करण्याची जबाबदारी सुद्धा शासनाची आहे. परंतु घटना घडणे, मंत्र्यांचे दौरे होणे, तात्काळ मदत जाहीर करणे, चौकशीचे आदेश देणे, पुनरावृत्ती होऊ नये म्हणून योजना जाहीर करणे अशा अनेक चक्रांमधून सदर घटना महिना न महिना जातो आणि सर्व बासनात गुंडाळून जाऊन पुन्हा पुढची घटना घडते आणि पुन्हा तेच सारे चित्र निर्माण होते.  

विचारवंतांच्या माध्यमातून अनेक एन जी ओ म्हणून कार्य करणाऱ्या संस्था निर्माण झाल्या आहेत. त्यांच्याकडे अपुरी आर्थिक स्थिती आणि अपुरे मनुष्यबळ असूनही वाखाणण्याजोगे कार्य अशा संस्थे द्वारे उभे केले जाते. सत्ताधारी , शासनाद्वारे अशा संस्थाचा गौरव देखील होत नाही, त्यासाठी वृत्तपत्र माध्यम दखल घेऊन सणासुदीचा प्रसंग पाहून यांचा सन्मान करीत असतात. 

असेच कार्य स्विसएड या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. निवडक स्त्रियांचा अनेक मुद्द्यांचा निकषावर अभ्यास केला, त्याचा सारांश केला आणि प्रत्यक्ष शासकीय मदत, प्रत्यक्ष उभे राहण्याची जिद्द कशी निर्माण होईल याचे पायरी पायरीने नियोजन केले आहे. प्रत्यक्ष शासनाच्या सेवेत असणाऱ्या, अशा प्रकारच्या कामाची जबाबदारी असणाऱ्या , ग्रामसेवक , तल्हाटी, जिल्हाधिकारी, सचिव तसेच यांच्यासह राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या, पंचायत सदस्य, आमदार ते खासदार ते मंत्री यांच्या कुणातही असे नियोजनपूर्वक, अभ्यासपूर्वक कार्य करण्याची इच्छा नाही का ते विचारच करू शकत नाही.  


या शिवाय सदर छापून आलेला लेख आणि स्विसएड संस्थेने केलेल्या अभ्यासाचे , नीट वाचन जरी केले आणि प्रत्येक घटकाने आपल्या परीने गाव पातळीवर सरपंच, जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, पालक मंत्री, संबधित खाते मंत्री , एक एक प्रश्न सोडविण्याचा विचार करून जरी अमलात आणला तरी स्विसएड संस्थेद्वारे केलेल्या अभ्यासाचे चीज होवो ना होवो पणं पती निधनामुळे हाल अपेष्टा स्त्रियांना कमीत कमी कष्ट घेऊन संसार करण्याची , मुलांना वाढविण्याची जिद्द तरी निर्माण होईल.


विजय आप्पा वाणी, पनवेल, (हल्ली मुक्काम फ्रँकफर्ट )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: