गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

लेख १८९ (६ डिसेंबर २०२४)

 

पोटनिवडणुकीतील घराणेशाही सुद्धा मारकच.

म टा दिनांक ५ डिसेंबर २०२४ अंकातील "विचार सदरातील" 'घराणेशाहीचे काय करायचे'  सविस्तर लेख वाचला. देशाचा,
राज्याचा पूर्व इतिहास पाहता, पोट निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मयत सदस्यांच्या घरातीलच व्यक्तीच्या नावाचा आग्रह धरला जातो कारण सहानुभूतीच्या माध्यमातून मते मिळवून विजयाची खात्री केली जाते.  हाच प्रयोग सर्वच पक्ष राबवितर, यात खरे नुकसान होते ते समान पातळीवरील नेत्यांचे पणं पक्ष आदेशामुळे या नाराज नेत्यांना, तुमचे योग्य पुनर्वसन केले जाईल, अशी अमिषे दाखविली जातात. सहनभुतीच्या नावावर घराणेशाही सुरू होऊन, बिच्चारे नेते, कार्यकर्ते साठीच्या उंबरठ्यावर पोहोचून अस्ताला जातात. गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात, अंदाजे शेकडो नेत्यांच्या निधनाने कित्येक कार्यकर्त्यांचे करिअर बरबाद झाले असेल आणि शेकडो  घराण्यातील कोणतेही राजकीय लेबल नसताना निवडून आलेले असतील. यास सत्तेचे बेरजेचे राजकारण जबाबदार आहे. सत्तालालसा हेच तत्व मोठे ठरते आणि घराणेशाही पुढे पक्ष निष्ठा , सेवा सारी एका क्षणात नष्ट होते. 

विजय आप्पा वाणी, पनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: