जागतिकीकरणात आता भारतीय प्रहर !!
म टा दिनांक २४ सप्टेंबर २०२४ अंकातील "अमेरिकेतील भारत प्रहर " अभ्यासपूर्ण संपादकीय वाचले . परराष्ट्र धोरण हे पंतप्रधान श्री मोदी यांचे मोठे बलस्थान आहे . धाडसी , दूरदर्शी आणि खंबीर नेतृत्वाच्या बळावर भारताची प्रतिमा निर्माण करताना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आघाड्यांवरील आव्हानांना न जुमानता समर्थपणे भेटी देत आहेत . सर्वच खंडातील लहान मोठ्या देशांच्या दौऱ्यातून सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय , सामरिक , कनेक्टिव्हिटी , क्षेत्रातील संबंधाचा विस्तार उल्लेखनीय ठरत आहेत . विशेषतः अमेरिकेतील सद्यकालीन आणि तत्कालीन सर्वच तीनही राष्ट्राध्यक्षांशी राजकीय धोरणात्मक, तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात परिणामकारण जागतिक संबंध उदयास येत आहेत . जगातील सर्वच विकसित किंवा प्रगतिशील राष्ट्रांचे शेजारील राष्ट्रांशी संबंध बिघडले असताना , भारत मात्र सर्वच देशांशी शिखर परिषद वा तत्सम बैठकांच्या माध्यमातून परस्पर संबंध वाढवीत आहे . यात एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते ती म्हणजे प्रत्येक देशात भारतीयांचे प्रमाण लक्षणीय आहे, त्यामुळे जागतिकीकरणात आता भारतीय प्रहर दिसू लागला आहे .
विजय आप्पा वाणी , पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा