परिपक्व आणि प्रबळ दावेदार होण्यासाठी काँग्रेसमध्ये परिवर्तन आवश्यकच.
दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ लोकसत्ता अंकातील " एनजीओ गिरी सोडा " संपादकीयात, एकंदरीत महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या पराभवाचे स्पष्ट विश्लेषण केले आहे. २०१७ मध्ये भाजपच्या धोरणांवर आणि मोदी यांच्या नेतृत्वावर तीव्र नाराजी व्यक्त करत नाना पटोले यांनी २०१७ मध्ये भाजप सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने नाना, प्रकाश झोतात राहून स्पीकर ते प्रदेक्षाध्यक्ष पद कायम अहंकारात राहिले. तसेच राहुल यांचा किसान पदयात्रा आणि भारत जोडो यात्रे नंतर आत्मविश्वास वाढेल असे वाटले होते, पणं केवळ अडाणीचे मोदानीत खेळ करत , इंडिया आघाडीच्या फसलेल्या चक्रव्यूहात, संविधान बचावाच्या नाऱ्यात अडकले. मणिपूर चा मुद्दाही अर्धवट सोडून देत, केवळ भाजपच्या इतर राज्यातील आणि विशेषतः लोकसभेतील पिछेहाटित धन्यता मानू लागले. सोनियांच्या अनुपस्थितीत उर्वरित नेतृत्वात अध्यक्ष खरगे आणि दोन चार प्रवक्ते सोडल्यास काँग्रेसला चेहरा राहिला नाही. महाराष्ट्रातील थोरात, वडवेट्टीवर, पृथ्वीराज बाबा, विश्वजित साऱ्यांचे संस्थानिकांसारखे वागणे पक्षाच्या ऱ्हासाची मुख्य कारणे आहेत. सद्यकाळात एकही विश्वासू चेहरा काँग्रेसकडे नाही, त्यामुळे नवीन विचार , ध्येय धोरणे , संकल्पना घेऊन पुढच्या सार्वत्रिक , राज्यांच्या निवडणुकीत उतरावे लागेल.
भाजपच्या यशामागे मजबूत संघटन, प्रचारतंत्र, आणि जनतेशी सतत संवाद हे प्रमुख घटक आहेत. काँग्रेसने भाजपकडून, संघटनात्मक बळकटपणा, ठोस आणि साधी संदेशवाहन पद्धत, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शक्तिशाली सर्वसमावेशक नेतृत्व, सतत संवाद आणि जनतेशी नाळ जोडणे, निवडणुकीसाठी दीर्घकालीन योजना, भावनिक कनेक्शन ठेवावे, स्वतःची वैचारिक ओळख (सेक्युलरिझम, सामाजिक न्याय, आणि समतोल विकास) अधिक ठामपणे लोकांसमोर मांडावी, प्रादेशिक नेत्यांना अधिक शक्ती द्यावी, स्थानिक विकासाला प्राधान्य, तरुणांसाठी नोकरी संधी उपलब्ध करण्याची हमी, आरोग्य आणि शिक्षणासाठी क्रांतिकारी योजना, स्त्रियांसाठी स्वतंत्र कार्यक्रम, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, इंडिया - महाविकास आघाडीतील दुय्यम स्थान नाकारणे. सुसंगत आणि दीर्घकालीन रणनीती आखून पक्षाला पुनरुज्जीवित करणे हाच एकमेव मार्ग आहे. तरच काँग्रेस परिपक्व आणि प्रबळ दावेदार होऊ शकते. बाकी उबाठा सेना आणि शप राष्ट्रवादी, या धक्क्यातून एवढ्या लवकर सावरतील असे वाटत नाही. पण आव्हाड आणि राऊत रोज काहीतरी उकरून काढून पक्षांचा झेंडा मिरवीत राहतील. त्याला बगल देऊन स्वतंत्र संसार निर्माण करण्यास हरकत नाही.
विजय आप्पा वाणी, पनवेल
दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ लोकसत्ता अंकातील " एनजीओ गिरी सोडा " संपादकीयात, एकंदरीत महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या पराभवाचे स्पष्ट विश्लेषण केले आहे. २०१७ मध्ये भाजपच्या धोरणांवर आणि मोदी यांच्या नेतृत्वावर तीव्र नाराजी व्यक्त करत नाना पटोले यांनी २०१७ मध्ये भाजप सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने नाना, प्रकाश झोतात राहून स्पीकर ते प्रदेक्षाध्यक्ष पद कायम अहंकारात राहिले. तसेच राहुल यांचा किसान पदयात्रा आणि भारत जोडो यात्रे नंतर आत्मविश्वास वाढेल असे वाटले होते, पणं केवळ अडाणीचे मोदानीत खेळ करत , इंडिया आघाडीच्या फसलेल्या चक्रव्यूहात, संविधान बचावाच्या नाऱ्यात अडकले. मणिपूर चा मुद्दाही अर्धवट सोडून देत, केवळ भाजपच्या इतर राज्यातील आणि विशेषतः लोकसभेतील पिछेहाटित धन्यता मानू लागले. सोनियांच्या अनुपस्थितीत उर्वरित नेतृत्वात अध्यक्ष खरगे आणि दोन चार प्रवक्ते सोडल्यास काँग्रेसला चेहरा राहिला नाही. महाराष्ट्रातील थोरात, वडवेट्टीवर, पृथ्वीराज बाबा, विश्वजित साऱ्यांचे संस्थानिकांसारखे वागणे पक्षाच्या ऱ्हासाची मुख्य कारणे आहेत. सद्यकाळात एकही विश्वासू चेहरा काँग्रेसकडे नाही, त्यामुळे नवीन विचार , ध्येय धोरणे , संकल्पना घेऊन पुढच्या सार्वत्रिक , राज्यांच्या निवडणुकीत उतरावे लागेल.
भाजपच्या यशामागे मजबूत संघटन, प्रचारतंत्र, आणि जनतेशी सतत संवाद हे प्रमुख घटक आहेत. काँग्रेसने भाजपकडून, संघटनात्मक बळकटपणा, ठोस आणि साधी संदेशवाहन पद्धत, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शक्तिशाली सर्वसमावेशक नेतृत्व, सतत संवाद आणि जनतेशी नाळ जोडणे, निवडणुकीसाठी दीर्घकालीन योजना, भावनिक कनेक्शन ठेवावे, स्वतःची वैचारिक ओळख (सेक्युलरिझम, सामाजिक न्याय, आणि समतोल विकास) अधिक ठामपणे लोकांसमोर मांडावी, प्रादेशिक नेत्यांना अधिक शक्ती द्यावी, स्थानिक विकासाला प्राधान्य, तरुणांसाठी नोकरी संधी उपलब्ध करण्याची हमी, आरोग्य आणि शिक्षणासाठी क्रांतिकारी योजना, स्त्रियांसाठी स्वतंत्र कार्यक्रम, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, इंडिया - महाविकास आघाडीतील दुय्यम स्थान नाकारणे. सुसंगत आणि दीर्घकालीन रणनीती आखून पक्षाला पुनरुज्जीवित करणे हाच एकमेव मार्ग आहे. तरच काँग्रेस परिपक्व आणि प्रबळ दावेदार होऊ शकते. बाकी उबाठा सेना आणि शप राष्ट्रवादी, या धक्क्यातून एवढ्या लवकर सावरतील असे वाटत नाही. पण आव्हाड आणि राऊत रोज काहीतरी उकरून काढून पक्षांचा झेंडा मिरवीत राहतील. त्याला बगल देऊन स्वतंत्र संसार निर्माण करण्यास हरकत नाही.
विजय आप्पा वाणी, पनवेल




