या उत्तीर्णांनी करायचे काय ?
गेल्या आठवड्यात १२ वीचा आणि कालच १० वीचा निकाल घोषित झाला . १२ वीत १३ लक्ष २९ हजार आणि १० वीत १४ लक्ष ८४ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झालेत . या उत्तीर्णांपैकी ६० टक्के विद्यार्थी म्हणजेच १६ लक्ष ८७ हजार विद्यार्थी जर विविध पदविका , पदवी परीक्षा पुढच्या पाच सहा वर्षात उत्तीर्ण होतील . या विद्यार्थ्यांतील केवळ ४. २५ लक्ष (२५%) विद्यार्थी प्लेसमेंट द्वारा , परदेशी शिक्षणासाठी, वडिलोपार्जित / स्व व्यवसायात गुंतल्यास, उर्वरित १२. ३० लक्ष विद्यार्थ्यांनी करायचे काय ? हा मोठा प्रश्न वर्षानुवर्षे भेडसावत आहे . दरवर्षीच असेच १२ लक्ष विद्यार्थी, कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्व्हिस इंडस्ट्री , कमी प्रमाण झालेले कॉल सेंटर्स , शॉपिंग मॉल्स, बँकिंग इत्यादी क्षेत्रात तात्पुरत्या स्वरूपाच्या कॉन्ट्रॅक्ट नोकरीसाठी वणवण भटकत असतात . वर्षभरात सरासरी विविध सेवांमधून २५ लक्षाच्या वर सेवानिवृत्त होत असून, त्या प्रमाणात १० टक्के देखील रोजगार उपलब्ध होत नाहीत . म्हणून या उत्तीर्णांनी करायचे काय ? बहुमताने निवडून येण्यासाठी जेवढी मेहनत खर्ची होते , त्याच्या पंचवीस टक्के जरी रोजगार निर्माण केला तर काही प्रमाणात तरी बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल .
विजयकुमार वाणी , पनवेल


