रविवार, २ जून, २०२४

लेख (१७५) ३ जून २०२४

 


काँगेसने पाच वर्षातील येणाऱ्या प्रत्येक तासाचे नियोजन करावे .  

लोकसत्ता दिनांक २ जून २०२४ अंकातील पी चिदंबरम यांचे "समोरच्या बाकावरून" लेखात सत्तेत बदल अपेक्षित असावा असे लिहिताना, नोटबंदी , कोरोना टाळेबंदीत झालेले नुकसान ,  आरक्षण , बेरोजगारी असे जुनेच खोड उगाळत बसले .  सातव्या फेरीच्या पूर्णतेआधीच एक्झिट पोल च्या आकडेवारीनुसार , एन डी ए आघाडी बहुमताकडे झुकल्याचे जाहिर  होत आहे . अर्थात लेखकांनाही याचा अंदाज आहेच .   त्यामुळे लेखकांनी, आता सत्ताधाऱ्यांना बोल लावत,  उपदेश देण्यापेक्षा,  काँग्रेसला चांगल्या चार गोष्टी शिकविण्यास हरकत नसावी .  त्यासाठी ताज्या महत्वाच्या वृत्तांचा ताळमेळ घेणे आवश्यक होते .  (१) रिझर्व्ह बँकेकडून केंद्राला विक्रमी लाभांश घोषित, अर्थ संकल्पाचे नियोजन कसे असेल ?  (२)  देशांतर्गत उत्पादनाची या वर्षात ८. २ वाढ नोंदविण्याची घोषणा, चीनपेक्षा सव्वा दोन टक्क्यांनी वरचढ असून, जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी व्यवस्था आहे.  भूक निर्देशांकात आपण कुठे ?  (३) आर बी आय चे माजी गव्हर्नर श्री रघुराम राजन यांच्या म्हणण्यानुसार, तरुण लोकसंख्येच्या लाभासाठी , ज्या पक्षाचे सरकार येईल , त्यांनी मनुष्यबळाचे शिक्षण , घसरलेला शिक्षण दर्जा , कौशल्य, रोजगार उपलब्धी यावर काम करावे ,  उगाचच २०४७ चे स्वप्न पाहू नये . (४) एप्रिल मध्ये जी एस टी चे २. १० लक्ष कोटी रुपये विक्रमी संकलन , राज्यांच्या तिजोरीत काय ? (५) चीन चे अरुणाचल प्रदेशासह , पीओकेच्या माध्यमातून वरील आक्रमण , संरक्षण क्षेत्रातील कामगिरी ? (६) वाढती महागाई (७) बेरोजगारी इत्यादी , अशा अनेक माध्यमांतून येणाऱ्या पाच वर्षांसाठी काँग्रेसने निवडून आलेल्या खासदारांतर्फे टप्प्या टप्प्याने एक एक विषय लावून धरत सत्ताधाऱ्यांकडून कामे करून घ्यावीत .  पाच वर्षातील ४३२०० तासांचे, राज्य, जिल्हा , तालुका ,पातळीवर नियोजन करावे .  उगाचच सुरवातीपासूनच प्रत्येक संसद अधिवेशनात गोंधळ घालून संसदेचा वेळ घालविण्यापेक्षा प्रत्येक अधिवेशनात एक एक विषय मुद्दा सोडवून घेतल्यास, पुढील पाच वर्षात विरोधक असून आम्ही एवढी कामे करून घेतलीत असे सांगून मत मागण्यास बळ येईल .  लेखकांचा प्रशासन , अर्थ , कायदेविषयक प्रचंड अभ्यास आहे , त्याचा विनियोग काँगेसच्या प्रगतीतील थिंक टॅंक म्हणून करून घ्यावा, जेणेकरून येणाऱ्या पाच वर्षात काँग्रेस स्वतःच एक सक्षम पक्ष म्हणून उभा राहून २०२९ च्या सत्तेची आस धरू शकेल.   

विजयकुमार वाणी , पनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: