शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०१०

तुमच्या ताकदीने लढा, इतरांच्या कमजोरीने नको. कारण खरे यश हे इतरांच्या पराभवात नसून तुमच्या प्रयत्नांमध्ये असतं ।

तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तुम्ही ज्याला कुणाला भेटता त्या व्यक्तीचे एक ध्येय असते । काही लोक तुमचा वापर करतील , तर काही जण तुम्हाला काही शिकवतील , कुणी तुमच्याकडून सर्वोत्तम परफॉर्मंस काढून घेईल , तर कुणी तुम्हाला दुःख पण पोचवेल , पण या सर्वांतून तुम्ही काही ना काही शिकाल . जीवनाची भेट जीवन हेच आहे .

तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवत असाल तर तो तुमचा सर्वात चांगला मित्र आहे । पण मनाद्वारे जर तुम्ही स्वतः नियंत्रित होत असाल तर तो तुमचा सर्वात मोठा शत्रु होऊन जातो ।

बी वाढत असते तेव्हा आवाज करत नाही , पण झाड पडते तेव्हा खूप आवाज होतो । विनाशात आवाज असतं तर सृजन नेहमी शांत असतो ।

मच्छिमारांना माहिती असतं की समुद्र खवळलेला असून वादळ घोंघावतय । पण ते त्यांच्यासाठी इतका मोठा धोका नसतो की ते किना - यावर राहतील ।

दोन परिस्थितीत शांत रहा - तुम्हाला लक्षात येत असेल की समोरची व्यक्ती तुमच्या शब्दात तुमच्या भावना समजून घेत नाहीए अशा वेळी आणि दुसरं , समोरची व्यक्ती तुमच्या शब्दाशिवाय तुमच्या भावना समजतोय ।

सुशिक्षित लोक परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतात .... मात्र अनुभवी लोक आपल्या मर्जीनुसार परिस्थिती बदलतात ।

चर्चा करते वेळी स्वतःचा आवाज चढवू नये । फक्त तुम्ही मांडत असलेल्या तर्कचा दर्जा वाढवण्यावर लक्ष द्या । गुड डे ...

एखाद्या व्यक्तीला समजून घेणं कठीण नाही ' आणि ' व्यक्ती वेगवेगळ्याप्रकारच्या असतात '। आम्ही केवळ एवढं लक्षात ठेवलं तर आमच्या जीवनात संबंध तुटण्यापासून वाचवू शकतो .






१ जुलै

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: