*वाईल्ड होय वाईल्ड सैराट रुपी मैत्री*
आठ वर्षांच्या मैत्रीचे नात्यात रूपांतर होऊन ऋणानुबंध घट्ट होत आहेत याची साक्ष क्षणाला क्षणाला होत असते. पहाटे उठून चालण्याचा व्यायाम , जिम, डोंगर माथ्यावर फिरणे, चित्रपट असो वारी , मारुती परिक्रमा असो ते चहा वडापाव मिसळ खाणे असो नव्हे चांगली मच्छी मिळते म्हणून सगळ्यांनीच एकत्रित जाणे असो, सगळीकडे एकत्रित जाणे हे क्रमप्राप्तच ठरते. वय पद प्रतिष्ठा त्यागून एवढ्यांचे मनोमिलन होणे हा ईश्वरी संकेत असेल. प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी नव्हे तर प्रत्यक्ष सहभागी होणे साऱ्यांनाच जमते असे नाही, पणं हे सारे अपवादात्मक आहेत एकापेक्षा एक सरस आहेत , एक श्रृंखला आहे, एक माळ आहे, नव ग्रह आहेत, नऊ रस आहेत, नऊ नाथ आहेत, त्यात साऱ्यांचीच एकच विचारसरणी आहे, हे महत्वाचे आहे.
या साऱ्यांना साथ आहे प्रत्येकाच्या अर्धांगिनीची, त्यांचा आप्तस्वकीयां विषयी जेवढे प्रेम आहे तेवढेच नव्हे त्या दुप्पट आस आहे या नात्याविषयी, त्यांना एवढा आत्मविश्वास आहे की आपल्या अर्थार्जना व्यतिरिक्त दिलेला वेळ सोडून, आपले हे असतील तर फक्त आणि फक्त नऊ जणांतच मग पहाट ते रात्र भोजनोत्तर असो , काळजी घेणारी मंडळी आहेच या आविर्भावात साऱ्या असतात. यातूनच त्यांचा प्रत्येकाप्रती भाव आहे , मनापासून विश्वास आहे.
अर्थात याचे सारे श्रेय आपण साऱ्यांनी भाग्यवान महान माता पिता, ज्यांनी अशा नऊ रत्न आणि त्यांच्या जोडीदार हिऱ्यांना जन्म दिला. प्रत्येकाच्या माऊलीने केलेल्या संस्कारावरच अशी नात्याची घट्ट विण विणायचे धारिष्ट्य मिळाले, एक अद्भुत मन जोडणी याच माता पित्यांच्याच आशीर्वादाने मिळाली हे सत्य आहे.
आकाशातील नऊ ग्रहे सदा सर्वकाळ कालातीत एकमेकांशी मिळून अभेद्य आहेत, त्यांना ना कसली प्रलयाची भिती ना श्रृंखला तुटण्याची. हेच ममत्व , प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, नाते, ऋणानुबंध अतूट राहो, हेच साऱ्यांच्या मनातले विचार प्रगटले. अश्रू दाटले नयनी पणं ते सदा सर्वकाळ खांद्यावर असलेल्या हातासाठीच. साऱ्या जीवा भावाच्या डोळ्यांसाठी आणि त्यांच्या अर्धांगिनीना समर्पित.