बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

बुधवार दी। ११ अगस्त २०१० पासून श्रावण मास सुरु होत आहे। पूर्वी च्याकाळात म्हणजे वीस पंचवीस वर्षांपूर्वी श्रावण मासात नित्य नियमाने कहाणी वाचली जायची। सोमवार म्हटला म्हणजे श्री शंकराची कहाणी , मंगलवारी देवीची, बुधवारी ब्रुहस्पतिची, गुरुवारी दत्ताची, शुक्रवारी देवीची, शनिवारी शनि देवाची, रविवारी आदित्य म्हणजे सुर्याची कहाणी वाचली जायची। कहाणी च्या सुरवातीला श्री गणेशाची स्तुति करून, प्रत्येकाच्या हातात, अक्षता दिल्या की, कहाणी संपेपर्यंत त्या अक्षता मनोभावे हातात धरून तास दिड तास सर्व लहना पासून मोठ्या पर्यंत बसायचे आणि कहाणी एकून सर्व सार ग्रहण करायचेत। अशी मजा रोजच असायची, मग नाग पंचमी च्या दिवशी वेगळी कहाणी, वेगला आहार, असायचा। प्रत्येक श्रावण सोमवारी उपवास, मग रक्षा बंधन, न दही हंडी , या सनांची मजा कही औरच। त्यात श्रावण सरी बरसलयत तर, बाल कविंची कविता आठवते,
श्रावण मासी, हर्ष मानसी,
हिरवल दाते, चोहिकडे,
क्षणात येते, सरसर शिरवे,
क्षणात फिरुने उन पड़े,